प्रतिनिधी/ सातारा
कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभागातील सुमारे 150 कर्मचायांचे चार वर्षांपासून सेवा पुस्तक पडताळणीची प्रकरणे प्रलंबित होती त्यामुळे कर्मचारी निवृत्ती वेतनासह अन्य मिळणाया लाभापासून वंचीत होते. याबाबत कर्मचाऱयांनी प्रहार संघटनेकडे धाव घेतली असता संघटनेच्या पदाधिकाऱयांनी संबंधित अधिकाऱयांच्या कारभाराचा पोलखोल करीत वंचित कर्मचाऱयांना न्याय मिळवून दिला.
याबाबत अधिक माहिती अशी कृष्णानगर येथील कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग या विभागामध्ये कार्यरत असलेल्या लेखनिक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, अवजड वाहतूक टेनर, फिटर, यंत्र कारागीर अशा चार पदांवर काम करीत असलेल्या सुमारे 150 कर्मचाऱयांची 2016 पासून सेवा पुस्तकांची पडताळणी प्रलंबित होती.
यातील बहुतांशी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना निवृत्ती वेतनासह मिळणाया अन्य लाभापासून वंचित रहावे लागले होते. वारंवार कार्यकारी अभियंता, संबंधित अधिकायांकडे सेवा पुस्तक पडताळणीसाठी हेलपाटे मारूनही संबंधित अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले होते. याबाबत कर्मचाऱयांनी कामगार राज्य मंत्री बच्चू कडू यांचे खाजगी स्वीय सहाय्यक गौरव जाधव यांच्या कडे धाव घेऊन अन्यायाचा पाढा वाचला. त्यांनी प्रहार संघटनेचे संपर्क प्रमुख शंभूराजे खलाटे, जिल्हा ध्यक्ष अमोल कारंडे, प्रणित भिसे, आप्पासाहेब पाटील यांच्यासोबत संबंधित कार्यालयात जाऊन अभियंता, लिपीकांची चांगलीच कानउघडणी केली.
प्रहारच्या पदाधिकाऱयांनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमारासमोर अधिकारी, लिपिक चिडीचूप झाले आणि चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या यांत्रिकी विभागातील सुमारे एकशे पन्नास कर्मचाऱयांची सेवा पुस्तक पडताळणीची प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात आली. चार वर्षानंतर प्रहार संघटनेच्या दणक्याने कर्मचाऱयांना न्याय मिळाला आहे.