एप्रिल ते 29 सप्टेंबर या कालावधीचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्राप्तिकर विभागाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार एक एप्रिल ते 29 सप्टेंबर या कालावधीत 33 लाखांपेक्षा अधिकच्या करदात्यांना 1.18 लाख कोटींचा परतावा दिला आहे. याच दरम्यान 31.75 लाख करदात्यांना 32,230 कोटी रुपयांचा वैयक्तिक कर परतावा दिला आहे. तसेच 1.74 लाख करदात्यांना 86,094 कोटी रुपयांचा कंपनी कर परतावा दिला असल्याची माहिती आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) कडून सीबीडीटीने 33.54 लाखपेक्षा अधिकच्या करदात्यांना एप्रिल 2020 ते 29 सप्टेंबर 2020 पर्यंत 1,18,324 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा परतावा सादर केला आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 31.75 लाख प्रकरणांमध्ये 32,230 कोटी रुपयांचा प्राप्तीकर परतावा सादर करण्यात आला आहे. तसेच 1.78 लाख प्रकरणात 86,094 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा सादर केला आहे.
सरकार कोविड19 महामारीच्या दरम्यान करदात्यांकडून विना समस्यांच्या करासंबंधी सेवा देणाऱयांवर जोर देत आले आहे. या अगोदर सीबीडीटीने वित्त वर्ष 2018-19 साठी प्राप्तीकर परतावा भरण्याची 31 जुलैची मुदत वाढवून 30सप्टेंबर केलेली आहे. सीबीडीबी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयामध्ये महसूल विभागाचा एक हिस्सा आहे.