नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने 2019-20 वर्षातील वैयक्तिक प्राप्तिकर भरण्यासाठीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या मुदतवाढीमुळे आता करदात्यांना 31 डिसेंबरपर्यंत प्राप्तिकर भरता येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
कोरोना व लॉकडाऊनमुळे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या नागरिकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे देशवासियांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. प्राप्तिकर भरण्यासाठी अखेरची तारीख 31 जुलै होती. मात्र, 13 मे रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा कालावधी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यानंतर प्राप्तिकर भरण्यासाठी पुन्हा एकदा केंद्र सरकारने डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.