27.55 लाख करदात्यांना लाभ
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी चालू वित्त वर्षामध्ये आतापर्यंत 27.55 लाख करदात्यांना 1,01,308 कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे. यामध्ये केंदीय बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेज(सीबीडीटी) च्या माहितीनुसार यामध्ये 30,768 कोटी रुपयांचा वैयक्तिक कर रुपामध्ये 25.83 लाख करदात्यांना परतावा दिला आहे. तसेच 1.71 लाखपेक्षा अधिक करदात्यांना 70,540 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स परतावा दिल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
वित्त वर्ष 2018-19 साठी प्राप्तीकर परतावा भरण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत निश्चित केली आहे. कोरोना कालावधीत केंद्र सरकारने करदात्यांना दिलासा दिलेला आहे. तसेच 31 मार्च 2020 पर्यंत आयटीआर सादर करण्याची वेळ दिली होती परंतु ती आता 30 सप्टेंबर 2020 केलेली आहे.
परतावा मिळवण्यासाठी जर का करदात्यांना परतावा कोणत्याही प्रकारे मिळत नसल्यास सदरच्या कर दात्यांना आपला स्टेटस तपासण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वात अगोदर https://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html या वेबसाईटवर जाण्याची आवश्यकता असून या ठिकाणी पॅन नंबर आणि ज्या वर्षाचा परतावा शिल्लक आहे, तो तपशील देत पुढील प्रक्रिया करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.