बळीराजाला प्राधान्य, शिक्षण, आरोग्य आणि महिलाविकासावर भर, रोजगारनिर्मितीचा प्रयत्न
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एकंदर, या अर्थसंकल्पावरील तज्ञांच्या प्रतिक्रिया पाहता, रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न यात केल्याचे दिसते. मात्र उद्योगजगताची अपेक्षा जितकी जास्त होती तितक्या प्रमाणात ती पूर्ण न झाल्याने शेअरबाजारावर या अर्थसंकल्पाचा प्रथमदर्शनी नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. त्यामुळे मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 900 हून अधिक अंकांनी घसरला. तथापि ही प्राथमिक प्रतिक्रिया असून सोमवारी शेअर बाजार पुन्हा सावरून मूळ पदावर येईल अशी अपेक्षाही तज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘समतोल साधण्याचा प्रयत्न’ असे असे या अर्थसंकल्पाचे सर्वसाधारण वर्णन तज्ञ व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून करण्यात येत आहे.
अर्थमंत्र्यांनी प्राप्तीकराचे दोन पर्याय लोकांसमोर ठेवणे हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्टय़ मानावे लागेल. असे पर्याय देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा पर्यायी कररचनेमुळे प्राप्तीकरदात्यांचा लाभ किती होणार हे कोणता पर्याय निवडला जातो, त्यावर अवलंबून राहणार आहे. हा नवा प्रयोग आहे, अशी प्रतिक्रिया तज्ञांनी व्यक्त केली आहे.
करण्यात आली आहे. मात्र ही सवलत हवी असेल तर इतर सर्व सवलती सोडाव्या लागणार आहेत. एकंदर, या दोन पर्यायांपैकी कोणता कोणासाठी लाभदायक ठरणार हे आताच निश्चित सांगता येणार नाही. हा निर्णय ज्याचा त्याने हिशेब करून घ्यावा लागणार आहे. यामुळे चार्टर्ड अकाऊंटंटचे साहाय्य प्राप्तीकर विवरण पत्र भरताना घ्यावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. नवा पर्याय अनेकांना लाभदायक ठरेल असे दिसते.
शेतकऱयांसाठी 16 सूत्री योजना
शेतकऱयांच्या उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. कृषीविषयक नवीन बाजारांची निर्मिती करण्याबरोबरच शेतकऱयांसाठी 16 सूत्री योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसेच दूध, मांस आणि मासे यांची नासाडी रोखण्यासाठी वातानुकूलित ‘किसान रेल’ चालवण्यात येणार आहे. पंतप्रधान कुसुम योजनद्वारे शेतकऱयांना सोलर पंपाने जोडले जाणार असून 20 लाख शेतकऱयांना या योजनेचा फायदा होणार आहे. याशिवाय 15 लाख कृषी ग्रीड पंपांना सोलरने जोडले जाणार आहे.
सोने दरात वाढ
शेअरबाजाराच्या घसरणीचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 270 रूपयांनी वाढ झाली. चांदीचे दरही काही प्रमाणात वाढले. शेअरबाजारातील गुंतवणूक कमी करून गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये पैसा घालण्यास प्रारंभ केल्याचे हे लक्षण होते. मात्र, सोमवारपर्यंत परिस्थिती सुधारेल असा विश्वास अनेक तज्ञांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे.
कारणे : उद्योगजगताच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने प्राथमिक प्रतिक्रिया म्हणून शेअरबाजाराची घसरण झाली असणे शक्य आहे, असे तज्ञांचे मत आहे. अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर काढण्यासाठी अर्थमंत्री धाडसी पावले उचलतील ही अपेक्षा होती. अर्थमंत्र्यांनी तसा प्रयत्न केला पण तो उद्योगजगताच्या अपेक्षेइतका नव्हता, असे बोलले जात आहे. आता सोमवारकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित
विविध बँकांच्या घोटाळय़ामुळे धास्तावलेल्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी घोषणा करताना बँक ठेवीवरील विमा संरक्षण 1 लाखांवरून 5 लाख रुपये करण्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. याचा कोटय़वधी बँक ग्राहकांना फायदा मिळणार आहे. सध्या ‘डिपॉझीट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन’च्या माध्यमातून बँकेतील ठेवींवर 1 लाखाचे विमा संरक्षण दिले जात होते. मात्र एकामागोमाग एक उघड झालेल्या घोटाळय़ांमुळे 1 लाखांहून अधिकच्या ठेवी असणारे ग्राहक भरडले गेले होते. तेव्हापासून हे विमा संरक्षण वाढवण्याची मागणी होत होती.