नवी दिल्ली
काही प्राप्तीकरदात्यांना पुन्हा मोठा दिलासा देताना केंद्र सरकारने प्राप्तीकर विवरणपत्र (आयटीआर) सादर करण्याचा दिनांक 15 मार्च पर्यंत वाढविला आहे. तथापि, याचा लाभ नोकरदार आणि व्यक्तिगत प्राप्तीकर भरणाऱयांना होणार नाही. त्यांच्या सादरीकरणाचा कालावधी 31 डिसेंबरलाच संपला आहे. नवी कालावधीवाढ ज्या करदात्यांना हिशेब आणि ऑडिट अहवाल सादर करावा लागतो त्यांच्यासाठी आहे. ज्यांनी अद्याप व्यक्तिगत प्राप्तीकर विवरणपत्र सादर केलेले नाही, असे करदाते 31 मार्चपर्यंत 5 हजार रुपये दंड भरुन आयटीआर सादर करु शकतात, असेही करविभागाने म्हटले आहे.