नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशातील कोरोना स्थितीवरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार मोदी सरकारवर निशाणा साधत असताता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. अशातच म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. प्रियांका गांधी यांनी ट्वीट करत म्युकरमायकोसिस यासाठी आवश्यक असलेली इंजेक्शन्स सहजरित्या उपलब्ध करण्याची आणि आयुष्यमान योजनेअंतर्गत त्याचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
प्रियांका गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, म्युकरमायकोसिसच्या इजेक्शनची मागणी वाढत आहे. या संकटात प्रत्येकवेळी आपल्याला औषधांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. याला जबाबदार कोण आहे? इंजेक्शन महाग आहे, आयुष्यमान योजनेत कव्हर होत नाही. मोदीजी, कृपया यासाठी लवकरात लवकर पावलं उचला,” असं त्यांनी म्हटले आहे. यासोबबतच त्यांनी एक आवश्यक अपील असं म्हणत काही मागण्याही जोडल्या आहेत.
यापूर्वी प्रियांका गांधी यांनी देशातील लसीकरण मोहिमेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. कोरोना विरोधी लसीकरणासाठीचा ३५ हजार कोटी रुपयांचा निधी नेमका कुठे खर्च केला गेला? , असा सवाल प्रियांका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यासोबतच राहुल गांधी यांनी देखील काल देशातील वाढती बेरोजगारी यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता.