दिल्ली / प्रतिनिधी
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने भारतात प्रेस स्वातंत्र्याबाबत काढलेल्या निष्कर्षांना केंद्र सहमत नाही, ज्यामध्ये खूपच कमी नमुना आकार घेतला असून. या सर्वेक्षणात लोकशाहीच्या मूलभूत गोष्टींना अत्यंत कमी महत्त्व दिले गेले आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत सांगितले.
या आंतरराष्ट्रीय पत्रकारितेने प्रकाशित केलेल्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2021 मध्ये भारताची घसरण झालेली नसली तरी, पत्रकारितेसाठी “खालच्या दर्जाच्या” वर्गीकृत देशांमध्ये त्याची गणना केली आहे. तसेच चांगल्या पत्रकारीतेसाठी योग्यदान देणार्यांसाठी सर्वात धोकादायक देशांपैकी एक म्हणून भारताची गणना केली आहे.
जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा 180 देशांपैकी 142 व्या क्रमांकावर स्थान असून याबाबतच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की,या संस्थेने सर्वेक्षणासाठी ज्या पद्धतीचा अवलंब केला आहे त्यामुळे हा अहवाल “संशयास्पद आणि गैर-पारदर्शक” आहे.