15 डिसेंबरपासून अंमलबजावणी होणार : : चिकोडी नगर परिषदेत व्यापाऱयांची बैठक
वार्ताहर / चिकोडी
राज्य व केंद्र सरकारकडून प्लास्टिक बंदी घालण्यात आली आहे. मात्र शहरात कारवाई शिथिल होताच व्यापाऱयांकडून प्लास्टिकचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नगर परिषदेच्या कार्यालयात उपनगराध्यक्ष संजय कवटगीमठ यांच्या अध्यक्षतेखाली प्लास्टिकमुक्त शहर करण्यासाठी फिरत्या व्यापाऱयांची सभा घेण्यात आली. तसेच 15 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर प्लास्टिकचा वापर आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली.
यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष संजय कवटगीमठ यांनी राज्य व केंद्र सरकारकडून प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नगर परिषदेच्यावतीने वारंवार नागरिकात जागृती करण्यात येत आहे. पण व्यापारी वर्गाकडून अधिक सहकार्याची अपेक्षा आहे. व्यापाऱयांनी कोणतेही साहित्य विकताना प्लास्टिकचा वापर करू नये. प्रत्येक व्यापाऱयांनी हे सक्तीने पाळल्यास नागरिकांना कापडी पिशव्या वापराची सवय लावणे सहज शक्मय असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी डॉ. सुंदर रोगी यांनी चिकोडी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी व्यापारी वर्गाचे योगदान आवश्यक आहे. ग्राहकांना कोणतेही साहित्य देताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन केले.
सर्व व्यापाऱयांनी प्लास्टिकचा वापर टाळल्यास व्यापारावर कोणताही परिणाम होणार नाही.
दिलेल्या मुदतीत असलेले प्लास्टिक संपवून 15 डिसेंबर नंतर सर्व व्यापाऱयांनी प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालावी, असे आवाहन केले.
आरोग्य निरीक्षक प्रियांका विनायक यांनी बोलताना त्या व्यापाऱयांनी फळे व इतर साहित्य विकताना प्लास्टिकऐवजी पर्यायी कापडी पिशव्या, ब्राऊन पेपर, न्यूज पेपर यांचा वापर करावा. सर्व व्यापाऱयांनी सहकार्य केल्यास शहरातील प्लास्टिकच्या वापरावर निश्चितच बंदी येणे शक्मय आहे. व्यापाऱयांनी स्वयंप्रेरणेने प्लास्टिक वापर बंद करावे तसेच ग्राहकांनाही याबाबत समजवावे. फिरत्या व्यापाऱयाच्या सभेनंतर कांही दिवसात शहरातील इतर व्यापाऱयाची सभा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक नागराज मेदार, विनायक तंगडी, वर्धमान सदलगे, आरोग्य निरीक्षक तुकाराम जमखंडी यांच्यासह शहरातील फिरस्ते व्यापारी उपस्थित होते.