बेळगाव / प्रतिनिधी
प. पू पंन्यास श्री भद्रानन्दविजयजी महाराज यांचे वयाच्या 89 व्या वषी राज्यस्थान मधील विजय पताका तीर्थ (गाव सीरोही) येथे शुक्रवार दि. 10 जुलै रोजी सकाळी 8 वाजता महानिर्वाण झाले.
पांगूळ गल्ली येथील श्वेतांम्बर संघाच्या शिखर बन्द देवळाची प्रति÷ापना 1978 मध्ये भद्रानन्दविजयजी महाराजांच्या हस्ते करण्यात आली. त्याबरोबरच महाराजांचे दोन चातुर्मास पांगूळ गल्ली येथील जैन मंदिरमध्ये झाले होते. चातुर्मास दरम्यान बेळगावच्या 25 भाविकांनी 30 दिवस केवळ पाणी प्राशन करून मासक्षमण उपवास केला होता. कोरोनामुळे महाराजांचे भक्तगण एकत्र जमू शकले नाहीत. मात्र भक्त व समाजाने शुकवारी आपापल्या घरामध्ये 12 नवकार आणि सामायिक घेऊन भद्रानन्दविजयजी महाराजांना श्रध्दांजली वाहिली.