ऑनलाईन टीम / बेंगळूर
तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे हरनेक सिंग यांनी धाडसी वक्तव्य केले असुन त्यांनी कृषी कायद्याला विरोध करण्यासंदर्भात भाष्य केले असुन कृषी कायदे हे अन्यायकारकच आहेत. त्यामुळे सिंग यांचे म्हणणे आहे की, देशातील सर्व लोक वादग्रस्त कायद्याचा विरोध करत आहेत. पण “फक्त मूर्ख लोकच गप्प आहेत”. रविवारी कर्नाटक जनशक्तीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना मोर्चाचे निमंत्रक हरनेक सिंग यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला
हरनेक सिंग यांनी मोदी सरकार “देशाच्या सार्वभौमत्वाच्या विरुद्ध” कायदे लादत असल्याचा आरोप केला.”कायद्याविरोधात आंदोलन सुरू होऊन एक वर्ष झाले आहे. तरी शेतकरी मागे हटणार नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सिंह यांच्या म्हणण्यानुसार, “इतरांनी” शेतकऱ्यांचे हक्क आणि संघर्ष यासाठी ठरवलेला काळ आता संपला आहे.”काही जण फक्त निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांच्या हक्काविषयी बोलत होते. पण आता ते शक्य नाही कारण शेतकरी स्वत: त्यांच्या हक्कांबद्दल बोलत आहेत आणि तेच त्यांच्या आंदोलनाचा मार्ग ठरवतील,” असेही ते म्हणाले. त्यामुळे कृषी कायद्यावरुन पुन्हा आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.