सहारनपूर / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील फटाक्मयांच्या कारखान्यात स्फोट झाल्यानंतर परिसराला भीषण आग लागली. दारुगोळय़ाचा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्मयात आणली. या भीषण दुर्घटनेत कारखाना मालक राहुलसह अन्य चौघांचा जागीच मृत्यू झाला. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज पाच किमी दूरपर्यंत पोहोचल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. तसेच स्फोटांमुळे मृतदेहांचे काही भाग 500 मीटर अंतरावर विखुरलेले आढळले.
सरसावा ते सुराणा दरम्यान अंबाला रोडवर दुर्घटनाग्रस्त फटाका कारखाना होता. शेतभागात हा कारखाना उभारण्यात आला होता. शनिवारी नेहमीप्रमाणे सुमारे 10 कर्मचारी येथे काम करत होते. यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक कारखान्याच्या एका कोपऱयात आग लागली. ही आग विझवण्यापूर्वी गनपावडरपर्यंत पोहोचल्यामुळे मजुरांना धावपळ करण्याची संधीही मिळाली नाही. आगीचे लोट तीन किमी अंतरावरून दिसत होते.