जत / प्रतिनिधी
कवठे महांकाळ तालुक्यातील कोगनोळी येथील राजाराम सूर्याबा माने (वय ४५) याने जत तालुक्यातील मुचंडी येथील वनविभागातील हद्दीतील झाडाशेजारी स्वतःची गाडी लावून दोरीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना अंदाजे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. राजाराम याचे फळांचा व्यापार होता.
या व्यापारामध्ये बरेच लोकांकडून पैसे येणे व व्यापारी याना पैसे देणे होते. ओमायक्रोन आणि कोरोणाच्या या सावटामुळे पैशाचे व्यवहार सुरळीत नसल्यामुळे मानसिक त्रास होऊ लागल्याने ही अशी टोकाची भूमिका घेतली असावी लोकांकडून अंदाज वर्तविला जात आहे.
या घटनेची माहिती मुचंडी गावचे पोलीस पाटील यांनी जत पोलिस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलिसांनी पोलीस पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह पोलिसांनी नातेवाईक यांच्या ताब्यात दिला. आधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार काका रूपनुर करीत आहेत.