ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या हवा प्रदूषणाची समस्या नवीन नाही. यावर उपाय म्हणुन दिल्ली सरकारने सम – विषम संख्येवरुन वाहन प्रवास मर्यादित केला. असे अनेक उपाय करण्याचा केजरीवाल सरकारने प्रयत्न केला आहे. मात्र तरी ही दिल्लीच्या हवेची प्रदुषण पातळी कमी झालेली नाही. यावरुन सर्वाच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले आहे. या प्रदूषणावरुन शेतीद्वारे होणारे प्रदूषण अधिक असल्याचे म्हणत पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी या हंगामात शेतातील तण जाळत असल्यामुळे त्याचा परिणाम होऊन दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या प्रश्नावरुन न्यायालयाने दिल्ली सरकारला संतप्त शब्दांत सुनावले.
फटकारताना “दिल्लीतीर फाईव्ह स्टार, सेव्हन स्टारसारख्या मोठ मोठ्या हॉटेलमध्ये बसून लोक शेतकरी कसे प्रदूषणात भर घालत आहेत यावर बोलत आहेत. तुम्ही कधी त्यांना जमिनीतून मिळणारं उत्पन्न पाहिलं आहे का ?” असा परखड सवालच न्यायालयानं केला आहे. तसेच, “आपण या वास्तवाकडेही डोळेझाक करतो की बंदी असूनही फटाके मात्र सर्रासपणे फोडले जात आहेत”, असं देखील न्यायालयाने नमूद केलं.
त्यामुळे प्रदुषणाचे खापर शेतकरीच्या डोक्यावर फोडण्याच्या तयारीत असताना वस्तुत: प्रदुषणाचा विळखा कोणत्या घटकामुळे अधिक घट्ट होतो आहे. हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे दिल्लीतील औद्योगिक क्षेत्रातून होणारे प्रदुषण अधिक प्रमाणात होत असल्याचे ही आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे दिल्ली परिसरातील शेतकऱ्यांना दोषी ठरवणारे आता आपला मोर्चा उद्योजकांकडे वळवतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.