प्रतिनिधी /फातोर्डा
फातोर्डा मतदारसंघातील प्रभाग 9 मध्ये आयोजित वनमहोत्सव कार्यक्रमात औषधी झाडे व फळझाडांच्या रोपटय़ांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास फातोर्डा भाजप मंडळ अध्यक्ष मनोहर बोरकर, राज्य महिला मोर्चा सरचिटणीस रंजिता पै, फातोर्डा महिला मोर्चा अध्यक्षा आशा गावस, शक्ती केंद्र प्रमुख नर्मदा कुंडईकर, राज्य सभासद भारती नाईक व इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
गावस यांनी स्वागत केले. बोरकर यांनी आपल्या भाषणात झाडे लावणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. कारण आपल्याला या झाडांमुळे प्राणवायू मिळतो. लहान मुलांचे जसे आपण पालन-पोषण करतो तसे सर्वांनी झाडांचे रक्षण करून आपल्या विभागातील झाडे वाढविण्यावर भर दिला पाहिजे. रोपटी ही शिशुसारखी असतात. त्यांचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
या प्रभागातील रहिवासी एडिसन आफान्सो यांनी बोलताना झाडांचे आपल्या दैनंदिन जीवनात असलेले महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले की, आपण आज जी आंबे, फणसा यासारखी फळे खातो ती झाडे आमच्या पूर्वजांनी लावलेली होती. त्यांच्यामुळे आम्हाला फळे मिळतात. तसेच प्रत्येकाने किमान दोन तरी रोपटी ?लावावीत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी या प्रभागातील लोकांना साधारणपणे 150 च्या वर रोपटय़ांचे वाटप करण्यात आले. कुंडईकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास राज्य महिला मोर्चा सचिव डॉ. स्नेहा भागवत व फातोर्डा मतदारसंघातील कार्यकर्त्या मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.