समुद्रकिनाऱयाच्या सफाई साठी राबले अनेक हात
प्रतिनिधी /मडगाव
दक्षिण गोव्यातील फात्राडे-वार्का समुद्रकिनारा हा एक सुंदर समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या दोन दिवसापासून या किनाऱयाची सुंदरा हरवली होती. या किनाऱयावर मोठय़ा प्रमाणात समुद्रातून कचरा आला होता. समुद्राच्या लाटाबरोबर हा कचरा समुद्रकिनाऱयावर पोचल्याने समुद्रकिनाऱयाची शान हरवली होती. मात्र, हा समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी अनेक हात राबले व या समुद्रकिनारा पुन्हा एकदम स्वच्छ झाला.
पावसाळय़ात दर वर्षी समुद्रकिनाऱयावर कचरा येतो व स्वच्छ समुद्रकिनाऱयांना कचरा यार्डचे स्वरूप प्राप्त होत असते. मात्र, यंदा फात्राडे-वार्का येथे आलेला कचरा प्रचंड प्रमाणात होता. गेल्या दोन दिवसापूर्वी या कचऱयासदंर्भात एका महिलेने आवाज उठविला होता व त्या संदर्भातील एक व्हिडिओ जारी केला होता. स्वच्छ व सुंदर फात्राडे-वार्का समुद्रकिनाऱयांची शान हरविली असून त्यांची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते.
एका महिलेने जारी केलेल्या व्हिडिओमुळे अनेकांना सत्य परिस्थिती कळून चुकली व गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ तसेच समुद्रकिनारे साफ करणारी यंत्रणा तसेच स्वंय सेवक यांनी पुढाकार घेऊन शनिवार पासून समुद्रकिनारे साफ करण्यावर भर दिला. काल रविवारी समुद्रकिनारा साफ करण्याची मोहिम यशस्वी झाली.
10 टन कचरा हटविला
कचरा हटविण्याच्या मोहिमेत सहभागी झालेले गौरव पोकळे माहिती देताना म्हणाले की, शनिवारी फात्राडे-वार्का समुद्रकिनारा साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, शनिवारी जोरदार पाऊस झाल्याने साफ-सफाई कामात अडथळे आले. मात्र, रविवारी पावसाने बऱयापैकी विश्रांती घेतल्याने हे काम पूर्ण करणे शक्य झाले. समुद्रकिनाऱयाच्या सफाईत अनेकांनी आपले योगदान दिले. अनेक हात त्यासाठी राबले.
या कचऱयात प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या इतर वस्तू तसेच इतर कचरा येऊन समुद्रकिनाऱयावर साचला होता. हा कचरा गोव्यातील असणार हे सांगता येत नाही. कचरा नेमका कोठून आला याचे भाकीत करणे कठीण आहे. समुद्राला छोटे-मोठे नाले, नदय़ा जोडल्या जातात. त्यातूनच हा कचरा समुद्राला मिळतो व समुद्र पुन्हा तो लाटासोबत किनाऱयाकडे पाठवित असतो असे गौरव पोकळे म्हणाले. माणूस प्लास्टिकचा कशा प्रकारे अमर्यादीत वापर करतो हे या कचऱयांतून स्पष्ट होत असते. प्लास्टिकच्या कचऱयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. तो असाच उघडय़ावर टाकून दिला की, तो पावसाळय़ात नदी-नाल्यातून समुद्राला जाऊन मिळतो व पुन्हा समुद्रकिनाऱयाला येऊन मिळतो. या कचऱयामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच. पण, समुद्रातील जलचरावर देखील विपरित परिणाम करीत असते.