वृत्तसंस्था/ जैसलमेर
200 कि.मी. पल्ल्याच्या फिट इंडिया वॉकेथॉनला शनिवारी राजस्थान वाळवंटी प्रदेशात प्रारंभ झाला. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी ध्वज दाखवून या मॅरेथॉनचे उद्घाटन केले.
भारत-पाक यांच्यातील राजस्थानच्या आंतरराष्ट्रीय बॉर्डर दरम्यान ही मॅरेथॉन होत आहे. येत्या डिसेंबर महिन्यात देशामध्ये भव्य प्रमाणात मॅरेथॉन आयोजित करण्याची घोषणा केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी यावेळी केली. फिट इंडिया वॉक मॅरेथॉन ही इंडो-तिबेटियन सीमा पोलीसदलातर्फे (आयटीबीपी) आयोजित केली आहे. या मॅरेथॉनमध्ये निमलष्करी दलातील तसेच राज्य पोलीस दलातील किमान 100 स्पर्धक सहभागी झाले आहेत. वाळवंटी प्रदेशातील ही वॉक मॅरेथॉन 2 नोव्हेंबरला संपणार आहे.