नवी दिल्ली
भारताने चालू वर्षातील फेब्रुवारीपर्यंत 92.97 गीगावॅट इतकी अक्षय ऊर्जेचे उत्पादन साध्य केले आहे. 50.15 गीगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना चालना देण्यासह विविध टप्प्यावर काम करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
देशात वर्ष 2022 पर्यंत 175 गीगावॅट अक्षय ऊर्जा उत्पादीत करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यसभेत एका लिखित प्ऱश्नाला उत्तर देताना ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांनी म्हटले आहे, की अक्षय ऊर्जा प्रकल्पांतर्गत फेबुवारी 2021 पर्यंत 92.97 गीगावॅट ऊर्जा उत्पादीत केली आहे.
आगामी काळातही 50.15 गीगावॅट क्षमतेचा प्रकल्प कार्यरत करण्यासाठी विविध टप्प्यावर काम सुरु करण्यात येणार असून यामध्ये 27.20 गीगावॅट ऊर्जा क्षमता उत्पादीत कामासाठी बोली लावण्यात येणार असल्याचे मंत्री सिंग यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी संभाव्य जमीन उपलब्धेसोबत इतर कामे हाती घ्यावी लागणार आहेत.
देशाची अक्षय ऊर्जा क्षमता
भारतामध्ये 10,97,465 मेगावॅट अक्षय ऊर्जेची क्षमता आहे. ज्यामध्ये 7,48,990 मेगावॅट सौर ऊर्जा, 3,02,251 मेगावॅट पवन ऊर्जा आणि 21,133.62 लघु पवन ऊर्जा (प्रत्येकी 25 मेगावॅटपर्यंत क्षमतेसोबत) समावेश होण्याचे संकेत आहेत.