गणपत गल्लीने घेतला मोकळा श्वास : पांढऱयापट्टीच्या आतील भागातच बसण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
बाजारपेठेत फेरीवाले आणि भाजीविपेत्यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याने सोमवारी पाहणी करण्यात आली. तसेच पांढऱयापट्टीच्या आतील भागातच फेरीवाले आणि भाजीविपेत्यांना बसण्याची सूचना मंगळवारपासून करण्यात आली आहे. त्यामुळे गणपत गल्लीसह परिसरात याची अंमलबजावणी सुरू झाली असून रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
गणपत गल्लीसह मुख्य बाजारपेठेच्या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच पार्किंगकरिता जागा नसल्याने दुचाकी वाहनधारकांना वाहने पार्क करणे अडचणीचे जात आहे. रस्त्याशेजारी दुचाकी पार्क केल्यास टोईंग करून वाहने नेण्याची कारवाई रहदारी पोलीस खात्याकडून करण्यात येत आहे. अशा विविध समस्या बाजारपेठेत निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
त्यामुळे महापालिका आयुक्त रुदेश घाळी, रहदारी विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आणि आमदार अनिल बेनके यांनी सोमवारी बाजारपेठेत फेरफटका मारून पाहणी केली होती. तसेच फेरीवाले आणि भाजीविपेत्यांसह पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली होती.
फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. पण सध्या रस्त्याशेजारी मार्किंग करण्यात आलेल्या पांढऱयापट्टीच्या आतील बाजूस बसून व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. याबाबत फेरीवाले व भाजीविपेत्यांना सूचना करण्यात आली असून शिस्त लावण्यासाठी रहदारी खात्याच्या पोलिसांनी मंगळवारपासून मोहीम हाती घेतली आहे. शनिवारखुंटपासून नरगुंदकर भावे चौकापर्यंतच्या गणपत गल्ली रस्त्यावर व्यवसाय करणाऱया सर्व फेरीवाल्यांना आणि अन्य व्यावसायिकांना पांढऱयापट्टीच्या आतच बसण्याची सूचना करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवार सकाळपासून या रस्त्यावरील फेरीवाल्यांची गर्दी कमी झाल्याचे दिसून आले. रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून व्यवसाय करणारे फेरीवाले रस्त्याच्या बाजूला थांबल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संपूर्ण रस्ता पादचाऱयांसाठी मोकळा झाला होता. मंगळवारी ही मोहीम राबविण्यात आल्याने रस्ता मोकळा झाला होता. यामुळे वाहनधारक आणि पादचाऱयांनी समाधान व्यक्त केले. पण ही मोहीम सातत्याने राबविणे गरजेचे आहे. एरवी फेरीवाले व भाजीविपेत्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातो. पण काही दिवसांनंतर याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी काही दिवसांतच पुन्हा ‘ये रे माझा मागल्या’ असा प्रकार दिसून येतो. बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत सातत्य हवे. त्याकरिता रहदारी खात्यानेच यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.