फेसबुकचे भारतात जाळे उभारण्यात वाटा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फेसबुकच्या पब्लिक पॉलिसी विभागाच्या प्रमुख अंखी दास यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. अंखी यांच्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुख्य आशय रोखण्यामध्ये पक्षपात झाल्याचा आरोप केला गेला आहे. फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
भारतात फेसबुकचे जाळे उभारण्यापासून दास या कंपनीच्या झटणाऱया कर्मचाऱयांपैकी एक असल्याचेही म्हटले आहे. त्यांनी 9 वर्षात कंपनीला विविध टप्प्यावर प्रगतीच्या मार्गावर पोहोचविण्यास मदत केली आहे.
अंखी भारतासह फेसबुकच्या दक्षिण आणि मध्य आशियातील संचालक म्हणून काम पाहत होत्या. अलीकडच्या काळात सरकारने फेसबुक, ट्विटर आणि ऍमेझान याच्यासंदर्भातल्या एकंदर घेतलेल्या भूमिकेच्या काळात त्यांनी राजीनामा दिला असल्याने त्याची चर्चा होते आहे.