प्रतिनिधी/ सातारा
सध्याच्या काळात जो-तो व्यक्ती आपापल्या मोबाईल मध्ये डोकाऊन बसलेला दिसत आहेत. कोणी कामकाजानिमित्त, तर कोणी गेम किंवा चॅटींगच्या निमित्त आदी विविध कारणांमुळे सर्वच मंडळी स्मार्ट फोनमध्ये गुंतलेले दिसत आहेत. अशातच सोमवारी अचानक फेसबुकचा सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे अनेकांची चांगलीच तारांबळ उडालेली होती.
केवळ माझ्याच नेटला प्रॉबलम झाला आहे का ? किंवा माझा नेट पॅक संपला आहे का ? रावटर खराब झाले आहे का? अशा अनेक शंका कुशंका अनेकांना उद्भवत होत्या. त्यामुळे काहींनी तर एकमेकांना विचारून या शंकांचे निसरण देखिल करूण घेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. सोमवारी रात्री 8 वा. 45 मि. युजर्सना अडचणी येऊ लागल्या. अखेर सात तासानंतर ऍप्सची सेवा पुर्वरत झाली.
फेसबुकच्या आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वात मोठा बिघाड ठरला आहे. अनेक कंपन्यांना ही याचा मोठा फटका बसला आहे. नेटवर्किंगमध्ये प्रॉब्लम झाल्याने ही अडचण निर्माण झाली होती. मात्र अखेर काही तासांनंतर पुन्हा ही सेवा पुर्वरत झाल्याने साताऱयातील कित्तेकांचा जिव भांडय़ात पडला आहे.