कोरोना संकटामुळे शिल्लक रकमेवर उदरनिर्वाह करण्याची सर्वसामान्यांवर वेळ
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे बँकांमधून रोख रक्कम काढणाऱयांची संख्या वाढत आहे. बँकांमध्ये पैसे जमा करणाऱयांपेक्षा खात्यातून रक्कम काढण्यासाठी ग्राहक रांगा लावत आहेत. बेळगाव परिसरातील सर्वच बँकांच्या बाहेर ग्राहक गर्दी करत आहेत. थंडावलेला व्यापार, व्यवसाय, नोकऱयांवरून देण्यात आलेली सुटी यामुळे बँकेतील शिल्लक रकमेवर उदरनिर्वाह करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आल्याचे दिसून येत आहे.
मागीलवर्षाच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचे थैमान सुरू आहे. यामुळे उद्योग व्यवसाय मंदावले आहेत. नोकऱया गेल्यामुळे बेरोजगारीही वाढली आहे. त्यामुळे कुटुंब चालविण्यासाठी बँकांमधील शिल्लक रक्कम काढली जात आहे. बँकांमध्ये रक्कम भरणाऱयांची संख्या 50 टक्क्मयांनी कमी झाली आहे. रक्कम काढण्यासाठी सकाळी 10 वाजल्यापासून बँकांसमोर रांगा लावल्या जात आहेत. ज्यांना एटीएमचा वापर करता येत नाही अशा वयस्कर लोकांची संख्या यामध्ये अधिक आहे.
पेन्शन काढण्यासाठी गर्दी वाढली
सरकारी नोकरदारांची पेन्शन महिन्याच्या पहिल्या तारखेपासून बँकांमध्ये जमा होते. ती काढण्यासाठी सोमवारपासून बँकांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे आता वृद्धाप, विधवा, दिव्यांग पेन्शन खात्यांमधून काढण्यासाठीही गर्दी वाढली आहे. गर्दी होऊ नये यासाठी बँक कर्मचाऱयांकडून सामाजिक अंतर राखण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
क्लोजडाऊनपासून आर्थिक व्यवहार मंदावले आहेत. खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावल्यामुळे याचा परिणाम बँकांवर दिसू लागला आहे. धनादेश वटविण्याचे प्रमाण 90 टक्के कमी झाले आहे. बँक, सोसायटय़ा यांच्याकडून होणारे कर्ज वितरणही थंडावले आहे. यामुळे आर्थिक व्यवहार मंदावल्याचे चित्र दिसत आहे.