प्रतिनिधी/ सातारा
बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचाऱयांनी दोन दिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे सोमवार व मंगळवारी बँक बंद ठेवण्यात आल्या आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स्, सातारा विभागानेही सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या धोरणाविरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभाग दर्शविला आहे. राष्ट्रीयकृत बँका ही जनतेची संपती आहे. त्यामुळे या बँकांचे खासगीकरण करू नये असे या संपाद्वारे सांगण्यात आले आहे. तसेच या संपां अंतर्गत ‘बँक बचाओ, देश बचावो’चा नाराही देण्यात आला. तसेच सातारातील कित्तेक बँकांच्या बाहेर याबाबतचे फलकही लावण्यात आले होते.
बँका बंद असल्यामुळे नागरिक मात्र नागरिक मात्र हैरान झाले आहेत. सध्या ऑनलाईन द्वारे व्यवहार चालत असले तरी काही ठिकाणी मात्र आजही रोख पैसे देऊनच व्यवहार चालतात. पण बँका बंद असल्याकरणाणे नागरिकांनी एटीएम कडे आपला मोर्चा वळविला होता. त्यामुळे कित्तेक एटीएम सेंटरच्या ठिकाणी भर उन्हात नागरिकांच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळत होत्या.
त्याचबरोबर काही एटीएम मध्येतर पैसेच उपलब्ध होत नव्हते. याचा नाहक त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत होता. कारण संपजरी दोन दिवसीय असला तरी बँका मात्र सलग चार दिवस बंद होत्या. कारण सेकंड सॅटरडे निमित्त रविवारी नेहमीचीच सुट्टी असल्याकारणाणे दि. 13 ते 16 दरम्यान सलग बँका बंद होत्या. याबाबत बँकेतर्फे ग्राहकांना ही पुर्वसुचना देखिल देण्यात आल्या होत्या.
सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. त्यात सध्या दोन बँका रडारावर असुन काही विमा कंपनींचे देखिल खासगीकरण होणार आहे. याविरोधातील देशातील जवळपास 10 लाख कर्मचाऱयांनी या बंद मध्ये सहभाग दर्शविला आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे कित्तेक कर्मचारी हे बेरोजगार होतील तसेच अशा प्रकारे सरकारी बँकांचे खासगीकरण केल्यास ग्राहकांची विश्वासार्हता कमी होईल. त्यामुळे या बँकांचे खासगीरण करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी या बँक कर्मचाऱयांतर्फे करण्यात येत आहे.