शासनाच्या व बँकेच्या अनागोंदी कारभारामुळे” शुन्याचा” फटका बसलेने कर्ज माफीतील
वंचित शेतकर्यांचा उपोषणाचा इशारा
प्रतिनिधी / वंदूर
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये करनूर व वंदूर मधील शेतकर्यांच्या अकाउंट नंबरच्यापुढे शुन्य न लागल्यामुळे त्याचा फटका शेतकर्यांना बसला आहे. कागल मधील देना बँकेच्या शाखेतून कर्जमुक्ती होऊन ही पिक कर्ज घेतलेल्या शेतकरी बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत.
शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या यादीमध्ये शेतकर्यांची नावे आहेत. बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी कागदात अडकली आहे. बँकेकडून घेतलेले पीक कर्ज 30 /9 /2019 रोजी थकीत आहे. थकीत पिक कर्ज महाराष्ट्र शासनाकडून महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 नुसार आहे. कर्ज माफी बँकेकडून केलेल्या थकबाकीदार कर्जदारांच्या यादीनुसार शेतकऱ्यांची महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 या पोर्टल वर जाऊन ऑनलाइन कर्जमाफी रितसर कर्जमान्य असलेबाबत आधार प्रमाणिकरण केले आहे.
महाराष्ट्र शासनाकडून बँकेकडे पीक कर्ज माफीची रक्कम जमा होत नाही अशी उत्तरे बँकेते कर्मचारी देत आहेत. तरी बँकेने आम्हा शेतकऱ्यांना तांत्रिक अडचण न सांगता शेतकऱ्यांची खाती निरंक करून नवीन कर्ज पुरवठा तात्काळ करावा. बँकेच्या चुकीमुळे आम्हा शेतकऱ्यांच्या थकीत शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिलो तर थकित कर्जदारांच्या रक्कमेस बँक जबाबदार राहिल. अशा आशयाचे निवेदन देवून महिना लोटला पण त्यावर कोणताही विचार झाला नसल्याचे दिसून येते.
करनूर, वंदूर येथील पीक कर्ज माफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटून परत एकदा त्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, आम्ही शेतकरी आपल्याकडे 15 मे 2020 रोजी कर्जमुक्तीचा अर्ज दिला होता. तसेच 29 मे 2020 रोजी आपल्या वरिष्ठांकडेही कर्जमुक्ती संदर्भातील अर्ज दिला होता. अद्याप आपल्याकडून व वरिष्ठांकडून सदर कर्जमाफीची कोणत्याही प्रकारची माहिती आम्हा शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही शेतकरी आर्थिक संकटात अडकलो आहे. आपण शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना त्वरित कर्ज पुरवठा उपलब्ध करून द्यावा. आमच्या प्रश्नाची दखल न घेतल्यास आम्ही शेतकरी सोशल डिस्टंसिंग बाळगून बँकेच्या समोर उपोषणाला बसू असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देताना सरपंच लक्ष्मण भंडारे, माजी सरपंच सचिन घोरपडे, सुनील गुदले, बाळासो चौगुले, राजू भोसले, सुखदेव कांबळे, महावीर डूगे, सुरेश परीट, शीतल पाटील वंदूर आदी शेतकरी उपस्थित होते.