ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बंगालच्या खाडीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. मंगळवारी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टल स्केल एवढी होती. अजून तरी या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली असल्याचे समोर आलेले नाही. भूकंपाचे केंद्र जमिनीखाली 10 किलो मीटर खोल अंतरावर होते. दरम्यान, याबाबत अजून पूर्ण माहीती मिळालेली नाही.
यापूर्वी सोमवारी (23 ऑगस्ट) आसाममध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 4 रिश्टल स्केल एवढी होती. काल दुपारी एक वाजून 13 मिनिटांनी झाला होता.