बळजबरीने बंद नको; आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळवारी शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमिवर येथील मार्केट एसीपी कार्यालयात सोमवारी सायंकाळी बेळगाव येथील शेतकरी नेत्यांची बैठक घेण्यात आली. बेळगावात बळजबरीने बंद करण्याचे प्रयत्न नको, असे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले आहे.
मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी आदी अधिकाऱयांनी या बैठकीत शेतकऱयांना मार्गदर्शन केले. बेळगावात बंदसाठी कोणावर बळजबरी नको, असा सल्ला पोलीस अधिकाऱयांनी दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे सिध्दगौडा मोदगी, चुन्नाप्पा पुजारी, वाजीद पटेल, जयश्री गुरण्णावर आदींसह नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. भारत बंदच्या पार्श्वभूमिवर बेळगावात शांततेत बंद होईल, असा विश्वास शेतकरी नेत्यांनी बोलून दाखविला.