ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या एलआयसीमधील आपली भागीदारी केंद्र सरकार विकणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली.
सीतारामन म्हणाल्या, एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसा प्रस्तावही केंद्र सरकारने ठेवला आहे. त्यासाठी एलआयसीबाबत समितीने केलेल्या शिफारसी सरकारने स्वीकारल्या आहेत. एलआयसीमधील आपली किती भागीदारी विकणार हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
एलआयसीबरोबरच सरकारचे नियंत्रण असलेल्या आयडीबीआय बँकेतील भागीदारीसुद्धा विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकार एलआयसीतील भागीदारी विकणार असल्याने एलआयसीचा आयपीए लवकरच बाजारात विक्रीसाठी आणण्यात येणार आहे. 2019-20 या आर्थिक वर्षांत विक्रीमधून 1 लाख 05 हजार कोटी रुपये जमवण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे.