ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
वयाची 75 वर्ष पूर्ण असलेल्या नागरिकांना आयटी रिटर्न्स भरण्यापासून मुक्ती देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्यामुळे 75 वर्षावरील नागरिकांना पेन्शन अथवा व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आता आयटी रिटर्न्स भरण्याची गरज नसेल.