बेळगाव / प्रतिनिधी :
तालुक्यात लागवड करण्यात आलेली बटाटे बियांणे बहुतांशी भागात कुजले असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे बटाटे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बुधवारी पश्चिम भागातील बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते आदी भागातील बटाटे उत्पादक शेतकऱयांनी एपीएमसीचे नूतन अध्यक्ष युवराज कदम यांची भेट घेवून बटाटे बियाणे कुजल्याची तक्रार केली. तसेच तातडीने पाहणी करून नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली. यावेळी अध्यक्षांनी अडत व्यापाऱयांशी चर्चा करुन कृषी खात्याकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
खरीप हंगामात तालुक्मयात भात पिकाबरोबर बटाटय़ांची मोठय़ा प्रमाणात लागवड केली जाते. मात्र यंदा उगविण्याआधीच बहुतांशी भागात बटाटे बियांणे कुजल्याने शेतकरी चिंतातूर बनले आहेत. बटाटे बियाणे कुजलेल्या शिवाराची तातडीने पाहणी करून संबंधित शेतकऱयांना नुकसान भरपाई देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱयांनी एपीएमसी अध्यक्षांकडे केली आहे.
लॉकडाऊनबरोबर बटाटे कुजत असल्याने मोठा फटका
लॉकडाऊनमुळे आधीच शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. त्यातच आता सोयाबिन व बटाटे पिके कुजत असल्याने शेतकऱयांसमोर नवे मोठे संकट उभे ठाकले आहे. विशेषकरून तालुक्मयातील हंदिगनूर, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, मण्णिकेरी, कडोली, केदनूर, बोडकेनहट्टी, कुरिहाळ, बेळगुंदी, बडस, बिजगर्णी, कल्लेहोळ, उचगाव, बसुर्ते, कोनेवाडी, अतिवाड, बेकिनकेरे, बस्तवाड(ह.), खमकारहट्टी, कोंडूसकोप्प, सुळगा-येळळूर, राजहंसगड, नागेनहट्टी, के. के. कोप्प, हलगा आदी भागात बटाटय़ाची लागवड करण्यात आली आहे. मात्र बियाणे खराब निघाल्याने शेतकऱयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
लागवडीसाठी आणलेली बियांणे खराब झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बटाटा लागवड केलेल्या शिवारात कोणती पेरणी करावी, असा प्रश्नही शेतकऱयांसमोर उभा आहे. यावेळी ग्रा. पं. सदस्य गजानन मोरे, नामदेव सावंत, अर्जुन भडांगे, नारायण शिंदोळकर, गुंडू भडांगे, कल्लापा भोगण, निवृत्ती भोगण, भावकू भडांगे, मारूती हुंदे आदी शेतकरी उपस्थित होते.