बद्रीनाथ / वृत्तसंस्था
कोरोनाच्या काळातील जवळपास दोन वर्षानंतर बद्रीनाथ धामचे दरवाजे सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. आता पुढील सहा महिने भाविकांना बद्री विशालचे दर्शन घेता येणार आहे. रविवारी सकाळी 6.15 वाजता बद्रीनाथ धामचे दरवाजे सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात आले. याप्रसंगी बद्रीनाथ धाम 20 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. यापूर्वी केदारनाथचा दरवाजा 6 मे रोजी उघडण्यात आला होता.
बाबांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी शनिवारपासूनच रांगा लावल्या होत्या. भक्तांची रांग सुमारे 3 किलोमीटर लांबीची झाली होती, त्यात सुमारे 15 हजार भाविकांचा सहभाग होता. या भाविकांमध्ये महिला, लहान मुले, वृद्ध अशा सर्व वयोगटातील लोकांचा समावेश होता. देशाच्या कानाकोपऱयातून हे लोक बद्रीनाथ धामला पोहोचले होते. गेल्या दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा बद्रीनाथमध्ये यात्रेचा उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या बद्रीनाथ परिसरामध्ये कडाक्मयाची थंडी आहे. मात्र, या थंडीतही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. कोरोना निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्याने यंदा यात्रेत विक्रमी गर्दी होण्याची शक्मयता आहे. तब्बल दोन वर्षानंतर यंदा बद्रिनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेता येणार असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
पहाटे 3 वाजता विधींना प्रारंभ
दरवाजे उघडण्यापूर्वी बद्रीनाथ मंदिर फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आले होते. रविवारी पहाटे तीन वाजल्यापासून दरवाजे उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. श्री कुबेरजी बामणी गावातून लक्ष्मी दरवाजातून मंदिरात पोहोचले. त्याचवेळी मुख्य प्रवेशद्वारातून डोली आत नेण्यात आली. बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी सकाळी 6.15 वाजता धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि लष्करी बँडच्या सुरांनी भाविकांसाठी खुले करण्यात आले. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यापूर्वी आदि शंकराचार्यांचे सिंहासन आणि भगवान विष्णूचे वाहन गरुडजींची मूर्ती तेल कलश (गाडूघडा) यात्रेसह जोशीमठच्या नरसिंह मंदिरातून त्यांच्या पुढील मुक्कामाला, योग-ध्यान बद्री मंदिर पांडुकेश्वर येथे नेण्यात आले.
सैन्याचा बँड
तत्पूर्वी शनिवारी जोशीमठ येथील नरसिंग बद्री मंदिरात पूजा केल्यानंतर रावल यांनी आराध्य गद्दी आणि गडू घागरी बद्रीनाथ धामला नेण्याची परवानगी मागितली. भाविकांच्या दर्शनासाठी माथांगणात आराध्य सिंहासन ठेवण्यात आले होते. याप्रसंगी महिलांनी पुष्पवृष्टी करून मंगल गीते गायली. गड्डी, रावल आणि गडू घडा यांना गढवाल स्काउट्स बँडच्या तालावर बद्रीनाथला रवाना करण्यात आले होते.
केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यापूर्वी बराच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, बद्रीनाथ धाममध्ये कुठेही विवादाची स्थिती दिसली नाही. धामच्या आसपास आणि 50 किमीच्या परिसरात लोकांना राहण्यासाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लोक बद्रीनाथ धामपासून 30 किमी दूर असलेल्या पांडुकेश्वरहून आरामात बद्रीनाथ धाम किंवा 50 किमी दूर असलेल्या जोशीमठपर्यंत पोहोचताना दिसत होते.
बद्रीनाथ कॉरिडॉर साकारणार
बद्रीनाथ धाममध्ये कॉरिडॉर बनवण्याचे काम सुरू आहे. वाराणसीच्या विश्वनाथ धामच्या धर्तीवर ते बांधले जाणार आहे. यासोबतच शहरातील मास्टर प्लॅनचेही काम सुरू आहे. सर्व दुकाने पाडली जात आहेत. पहिल्या टप्प्यात 29 दुकाने आणि हॉटेल्स पाडण्यात आली आहेत. दुसऱया टप्प्यात इतर अनेक व्यावसायिक आस्थापने उभारली जाणार आहेत. या निर्णयामुळे व्यापाऱयांमध्ये नाराजी असली तरी पर्यटनदृष्टय़ा सकारात्मकता तपासून नियोजन करण्यात आले आहे.
दर्शनासाठी नोंदणी बंधनकारक
चारधाम यात्रेत मोठय़ा संख्येने भाविक येतील असा अंदाज आहे. पण एका दिवसात केवळ 15 हजार भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. दर्शनासाठी पर्यटन विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडून सर्व सज्जता तपासली जात आहे. आता कडाक्मयाच्या थंडीतही मोठय़ा उत्साहात यात्रेला सुरुवात झाली आहे. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.