जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यात बर्ल्ड फ्लूवर’चा शिरकाव झालेला आहे. याबाबत समज-गैरसमज पसरवली जात आहे. याबाबतची जनजागृती करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने परिसंवाद चर्चासत्राचे आयोजन केले आहे. रविवार 24 रोजी दुपारी चार वाजता मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र शासकीय विश्राम ग्रह जवळ हा कार्यक्रम होणार आहे. तरी या व्यवसायाशी संबंधित यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर वाय. ए. पठाण यांनी केले आहे.
परभणी मार्गे राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला. कोल्हापुरातही रंकाळा तलाव अन्यत्र काही पक्षी मृत्यू त्यामुळे लोकांच्या मध्ये गैरसमज पसरला आहे. चिकन अंडी दरात पन्नास टक्क्यांहून अधिक घट झाली त्याचा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला त्यामुळे अनेक बेरोजगार तरुण रस्त्यावर येण्याची वेळ आली बर्ड फ्लू हा रोग पक्षाकडून पक्षाकडे संक्रमण होतो मानवी आरोग्याला याचा अजिबात धोका नाही. यासाठी जनतेचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. म्हणून रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे अशी माहिती डॉक्टर पठाण यांनी दिली.