शिवप्रतिष्ठानचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी आपले बलिदान दिले आहे. मोगलांनी त्यांना पकडल्यापासून मृत्यूपर्यंत वेदना देऊन मारण्यात आले. याची जाणीव आजच्या पिढीला व्हावी, यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने प्रतिवषी धर्मवीर बलिदान मास आचरणात आणला जातो. यावषी 2 मार्चपासून 1 एप्रिलदरम्यान बलिदान मास पाळला जाणार असून प्रत्येक गल्ली, गाव व विभागामध्ये त्याचे आचरण व्हावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठानतर्फे बैठकीदरम्यान करण्यात आले.
शिवप्रतिष्ठानची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी रात्री पार पडली. जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. कार्यकर्ते आपली एक सवय अथवा खाद्यपदार्थ वर्ज्य करून बलिदान मास आचरणात आणतात. अनेकजण मुंडन करून, गोड अथवा मांसाहारी पदार्थ वर्ज्य करून तर काहीजण पायात चप्पल न घालता बलिदान मासाचे पालन करतात. बलिदान मासानिमित्त रायगडावर होणाऱया सुवर्ण सिंहासनासाठी निधी संकलन, खडा पहारासाठी नोंदणी केली जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
संभाजी चौक सुशोभिकरणामध्ये दिरंगाई
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या मूर्ती बाजूचे सुशोभिकरणाचे काम मागील दोन ते तीन वर्षांपासून रखडले आहे. काम संथगतीने सुरू असल्याने ते पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. शहरातील महत्त्वाचा चौक असणाऱया संभाजी चौकातील कामात दिरंगाई होत असल्याने शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. येत्या महिनाभरात काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा बैठकी दरम्यान देण्यात आला.
या बैठकीला शिवप्रतिष्ठानचे शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, चंद्रशेखर चौगुले, किरण बडवाण्णाचे, गजानन निलजकर, गजानन पवार, सचिन कळवेकर, गुंडू कदम, मल्लेश बडमंजी, विशाल पाटील, प्रसाद बाचोळकर, पुंडलिक भारती, बाळू गुरव, ऋतिक पाटील, कल्लाप्पा गोरल, संजय कित्तूर, मनोहर पाटील, सोमेश बेनके, महेश जांगळे, महेश पोटे यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.