केवळ बैठका नको, कार्यालयातून बाहेर पडा : एडीजीपी भास्करराव यांची अधिकाऱयांना सूचना : बेळगावतून मारला फेरफटका
प्रतिनिधी / बेळगाव
नागरिकांच्या सहकार्यानेच कोरोनावर मात करणे शक्मय आहे. त्यांना त्रास देऊन काहीही साध्य होणार नाही. म्हणून राज्य सरकारने बळाचा प्रयोग टाळावा, लोकांच्या सहकार्याने कार्य करावे. तसेच अधिकाऱयांनी केवळ कार्यालयात बसून बैठका घेणे बंद करावे व आता प्रत्यक्ष कार्यासाठी बाहेर पडावे, अशी सूचना आपण केली आहे, अशी माहिती अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक (एडीजीपी) भास्करराव यांनी दिली.
कोरोना महामारी थोपविण्यासाठी राज्य सरकारने सात वरि÷ पोलीस अधिकाऱयांची वेगवेगळय़ा जिल्हय़ांवर प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. भास्करराव यांची बेळगाव उत्तर विभागासाठी नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी त्यांनी पोलीस मुख्यालयात अधिकाऱयांची बैठक घेतली. तसेच त्यांनी शहरातून फेरफटका मारून गरजूंना मास्क वितरण केले. त्यानंतर अंजुमन हॉलमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी आदींसह वरि÷ अधिकारी उपस्थित होते.
पोलीस दलाच्यावतीने कोरोना थोपविण्यासाठी अधिकारी व पोलीस कार्यरत आहेत. तीन गोष्टींवर भर देण्यात आला आहे. मास्क वापर, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर राखणे याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. केवळ बळाचा प्रयोग करून ही कामे होणार नाहीत. म्हणून वरि÷ अधिकाऱयांना रस्त्यावर उतरण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक व पोलिसांत उत्साह संचारणार आहे.
शुक्रवारी आपण दीड हजार मास्कचे वाटप केले. नागरिकांच्या सहकार्याने ही कामे करता येणार आहेत. मास्क वाटपासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा. अनेकांना मास्क खरेदी करणे होत नाही. याबरोबरच सोशल मीडियावर कोरोनावरील लस आणि लसीकरणाच्या मोहिमेबद्दल कोणीही अपप्रचार करू नये. लस घ्या असे सांगत आज सरकार तुमच्या मागे लागले आहे. याचा प्रत्येकांनी सदुपयोग करून घ्यावा. अनेक पोलीस अधिकाऱयांनीही लस घेतली आहे. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही लस देण्यासाठी जागृती करण्यात येत आहे. अफवा पसरविणाऱयांविरुद्ध 112 या क्रमांकावर माहिती दिल्यास कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मठाधीश, बिशप यांचीही भेट घेणार
शुक्रवारी आपण अंजुमन आणि मुस्लीम धर्मगुरुंची बैठक घेऊन कोरोना विषाणूबाबतच्या जनजागृतीवर भर देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आहे. धार्मिक प्रमुखांनी जर जागृती केली तर ते लोकांच्या मनात बिंबेल. त्यामुळेच आपण धार्मिक प्रमुखांशी चर्चा सुरू केली आहे. शनिवारी नागनूर रुद्राक्षीमठ, हुक्केरी हिरेमठाला भेटी देऊन स्वामीजींशी चर्चा करणार आहे. बिशपनाही भेटून जनजागृतीसाठी त्यांची मदत घेणार असल्याचे भास्करराव यांनी सांगितले.
विकेंड कर्फ्यूला सुरुवात
शुक्रवारी रात्री 9 पासून सोमवारी सकाळी 6 पर्यंत राज्य सरकारने घोषित केलेल्या विकेंड कर्फ्यूला सुरूवात झाली. रात्रीपासून पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले असून प्रमुख मार्गावर बॅरिकेड्स उभे करुन तपासणी हाती घेण्यात आली आहे. रविवारी सकाळी 6 ते 10 पर्यंत दूध, भाजीपाला, किराणा दुकाने आदी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
10 नंतर पुन्हा कर्फ्यू जारी असणार आहे. यासंबंधी तरुण भारतने पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांच्याशी संपर्क साधला असता शनिवारी व रविवारी दोन्ही दिवशी सकाळी 6 ते 10 पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. लांब पल्ल्यातील बससेवाही असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दूध, किराणा दुकाने, भाजीपाला, फळे आदी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. या कर्फ्यूचा हॉस्पिटल व औषध दुकानांना संबंध नसणार आहे. दोन्ही दिवशी चार तास मांस विक्री दुकानेही सुरू राहणार आहेत. अनावश्यकपणे घराबाहेर पडणाऱयांना पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू असल्यामुळे परगावाहून बेळगावात येणाऱयांची तिकीटे तपासून त्यांना घरी जावू देण्यात येणार आहे.
एकूण 57 तासांचा हा कर्फ्यु असणार आहे. राज्य सरकारने दोनवेळा वेगवेगळे आदेश काढुन मार्गसुची जारी केली आहे. त्यामुळे या मार्गसुचींबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. कारण कारखाने सुरू असतील असे सरकारने जाहीर केले होते. कर्फ्युच्यावेळी कामगार कामावर जाणार कसे? या प्रश्नाचे उत्तर दिले गेले नाही. मात्र शुक्रवारी रात्री या संबंधीचा खुलासा सरकारने यंत्रणेकडे केला असून ओळख पत्र तपासून त्यांना सोडण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त यशोदा वंटगोडी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त मुत्तुराज आदींसह शहरातील बहुतेक अधिकारी शुक्रवारी रात्री 9 नंतर कर्फ्युच्या अंमलबजावणीसाठी शहराचा फेरफटका मारताना दिसत होते. बळाचा वापर करु नका, अशी सूचना अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक भास्करराव यांनी पोलीस अधिकाऱयांना केली आहे.