जलसमाधी परिक्रमा यात्रेत महिला भाऊक, परिक्रमा यात्रेच्या मार्गावर ठिकाणी महिलांकडून औक्षणकोल्हापूर प्रतिनिधी
प्रतिनिधी/कोल्हापूर
पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पंचगंगा जलसमाधी परिक्रमा यात्रेला आज सुरुवात झाली. दरम्यान, महापुराने उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची पंचगंगा परिक्रमा जलसमाधी यात्रा महापूराची राजधानी नरसिंहवाडी च्या दिशेने कुच झालेली आहे.
सकाळी दहा वाजता प्रयाग चिखली येते दत्त महाराजांचे दर्शन घेऊन यात्रेस प्रारंभ झाला. प्रयाग संगम, प्रयाग चिखली येथून कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंबेवाडी येथे दुपारी बारा वाजता यात्रा दाखल झाली. यात्रेच्या मार्गावर ठीक ठिकाणी महिलांसह पूरग्रस्त शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. महिलांनी औक्षण करून बळीराजाला जलसमाधी च्या धर्म संकटातून सोडव, त्याच्यावरती समाधी घेण्याची वेळ येऊ नये अशी प्रार्थना केली.
हातात स्वाभिमानी चा झेंडा खांद्यावर ऊसाचा बुडका आणि मुखात एकच राजू शेट्टी अशी घोषणा देत मोठ्या संख्येने महिला परिक्रमा यात्रेत सहभागी झाल्या आहेत. यात्रेच्या मार्गावर सहभागी शेतकऱ्यांसाठी ठिकाणी दूध वाटप केले जात होते. आंबेवाडी येथील हनुमान मंदिराजवळ स्वागत झाल्यानंतर वडणगे च्या दिशेने परिक्रमा यात्रा रवाना झाली. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष वैभव कांबळे, जिल्हा अध्यक्ष जनार्दन पाटील, राम शिंदे, माणगाव चे माजी सरपंच अनिल पाटील, युवक नेते संदीप कारंडे, आधी प्रमुख पदाधिकारी शेट्टी यांच्यासोबत आहे.