बेकवाडच्या पाटील कुटुंबीयांनी साकारला स्वावलंबनावर देखावा
प्रतिनिधी /बेळगाव
‘नोकरी मिळत नाही? कोरोनामुळे उद्योग ठप्प झाले? काही हरकत नाही. शेतीकडे वळा आणि स्वावलंबी व्हा! बळीराजाचा सन्मान करा,’ असा अत्यंत सकारात्मक संदेश देणारा देखावा सादर केला आहे, खानापूर तालुक्मयाच्या बेकवाड येथील रायगौडा पाटील कुटुंबाने.
भारत कृषीप्रधान देश आहे. शेती टिकली तरच देश तरणार आहे. मात्र अलीकडे बळीराजाची अनेक तऱहेने परवड होत आहे. इतकेच नव्हे तर विवाहेच्छुक तरुणी ‘शेतकरी नवरा, नको गं बाई!’ असे म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि शेती यांचे महत्त्व अधारेखित करणारा देखावा या कुटुंबाने साकारला आहे.
या कुटुंबाने बाप्पाला बैलगाडीतून भाताची भरलेली पोती घरी आणतानाचे दृष्य दाखविले आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱया गेल्या. अनेक हातांचे काम थांबले. त्यामुळे शहरात गेलेले परत आपल्या मूळ गावी आले आणि आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये त्यांनी काम सुरू केले. अर्थातच पोटा-पाण्याचा प्रश्न मिटला. यामुळे शेती किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शेतातील उत्पन्न वाढवून देशाच्या आर्थिक विकासात भर घालण्यासाठी सर्वांनी शेती करावी, असे या कुटुंबातील ज्ये÷ सदस्य नामदेव पाटील सांगतात.
तरुणाईला अलीकडे शेतीचे महत्त्व लक्षात येत नाही. या देखाव्यातून ते पटवून देण्याचा प्रयत्न आहे. दरवषी आम्ही वेगवेगळे देखावे साजरे करतो. या निमित्ताने सर्व कुटुंबिय एकत्र येते. गतवषी दिंडी सादर केली होती, असे रायप्पा व भाऊराव पाटील यांनी सांगितले.