आतापासूनच गाळ काढणे महत्त्वाचे : अन्यथा पुढील वषीही पुराचा बसू शकतो फटका : मोठा निधी नियोजनबद्धरीत्या खर्च करणे गरजेचे
प्रतिनिधी / बेळगाव
बळ्ळारी नाल्याला दरवषीच पूर येतो. त्यामुळे बळ्ळारी नाल्याची कथा आणि शेतकऱयांची व्यथा संपता संपत नाहीत. दरवषीच येथील शेतीला फटका बसून शेकडो एकर जमिनीमधील भात पिकाचे नुकसान होत आहे. पुढील वषी पूर यायचा नसेल तर आतापासूनच बळ्ळारी नाल्याची खोदाई करणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱयांनी व्यक्त केले आहे.
यावषीही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्यात बळ्ळारी नाल्याला पूर आला होता. पावसामुळे शहापूर, येळ्ळूर, मजगाव, धामणे, वडगाव, अनगोळ शिवारातील पीक दरवषीच पाण्याने खराब होत आहे. जोराचा पाऊस झाल्यानंतर बळ्ळारी नाला परिसराला जलाशयाचे स्वरुप प्राप्त होत आहे. पाणथळ जमीन तसेच बळ्ळारी नाला माती व झाडाझुडपांनी पूर्ण बुजल्यामुळे पाणी शिवारात शिरत आहे. त्यामुळे भात पेरणी करूनही शेतकऱयांना फटका बसू लागला आहे. दरवषीच हा प्रकार घडत असूनही याकडे लघुपाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष होत आहे.
बळ्ळूरी नाला शेतकरी वर्गासाठी अतिशय तापदायक ठरू लागला आहे. कारण नाला पूर्णपणे गाळाने आणि जलपर्णीनी भरून गेला आहे. त्यामुळे थोडा पाऊस झाला तरीही नाल्यातील पाणी शिवारांमध्ये जात आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षीच फटका सहन करावा लागत आहे. तरीही प्रशासनाला शेतकऱयांची चिंता आणि आत्मियता नसल्यामुळे फक्त पाहणी केल्याचे नाटक केले जात आहे. एकीकडे शेतकऱयांच्या सुपीक जमिनी नापिक दाखवून शेतकऱयांची लूट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे वडगाव, शहापूर आणि बेळगाव परिसरातील दुबार पिके देणारी शेतजमीन पाण्याखाली जाऊन शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी दरवषीच संकटात सापडत आहेत.
खर्च केलेला निधी गेला वाया
काही वर्षांपूर्वी खासदार फंडातून बळ्ळारी नाल्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र हे काम अतिशय चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. नाल्यातील काढण्यात आलेला गाळ नाल्याच्याच शेजारी काढून ठेवण्यात आला. वास्तविक पाहता त्याच वेळी नाल्यातील गाळ काढून तो इतरत्र टाकणे गरजेचे होते. मात्र नाल्याशेजारीच गाळ ठेवल्यामुळे पावसाने पुन्हा गाळ नाल्यात गेला. त्यामुळे पूर्ण बळ्ळारी नाला बुजला असून खर्च केलेला निधी वाया गेला आहे.
मोठी डोकेदुखी म्हणजे भाग्यनगर, अनगोळ, वडगाव परिसरातील डेनेजचे पाणी नाल्यात सोडण्यात येत असल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. कचराही फेकण्यात येत आहे. येळ्ळूर रस्त्यावरील बळ्ळारी पुलाच्या खाली अक्षरशः कचऱयाचा ढीग साचला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे अशक्मय आहे. यातच नाल्यात मातीचा गाळ साचून राहिल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा बळ्ळारी नाल्याचे काम योग्यरितीने होणे आवश्यक आहे. बळ्ळारी नाल्याला मोठा निधी मंजूर करून तो निधी नियोजनबद्धरीत्या खर्च करणे गरजेचे आहे.
काँक्रीटचे पक्के बांधकाम आवश्यक
डेनेजचे पाणी तसेच कचरा मोठय़ा प्रमाणात फेकण्यात येत असल्यामुळे आता आणखीनच गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बळ्ळारी नाला परिसरातील शेकडो एकर जमीन सध्या पाण्याखाली जात आहे. मात्र अशीच अवस्था राहिल्यास आणखी येळ्ळूर, अनगोळ, मजगाव शिवाराला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. आतापासूनच या नाल्याची खोदाई करून नाल्यामध्ये काँक्रीट घालून दोन्ही बाजूंनी पक्के बांधकाम करावे, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.
जाणीवपूर्वक दुर्लक्ष
बळ्ळारी नाल्याची खोदाई करावी यासाठी शेतकऱयांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मात्र याकडे लघुपाटबंधारे विभाग आणि लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा शेतकऱयांचा आरोप आहे. त्यामुळेच दरवर्षी शेतकऱयांना हातातोंडाशी आलेल्या पिकांवर पाणी सोडावे लागत आहे. याचबरोबर दुबार पेरणी करून त्यानंतर पुन्हा भाताची लागवड करावी लागत आहे. अशीच अवस्था राहिल्यास या परिसरातील शेतकऱयांना शेतीच नको म्हणण्याची वेळ आली आहे.