शेतकऱयांची मागणी : पावसाळय़ापूर्वी काम होणे महत्त्वाचे : सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधी : जलपर्णी तातडीने काढण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
बळ्ळारी नाला आता दूषित पाणी वाहणारा नाला झाला आहे. पूर्वी या नाल्यातून येळ्ळूर, मजगाव, अनगोळ या परिसरातील शेतवडीचे पाणी वाहत होते. मात्र, आता हा नाला म्हणजे डेनेजचे पाणी वाहणारा नाला बनला आहे. वडगावसह परिसरातील डेनेजचे पाणी या नाल्यात सोडल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. महत्त्वाचे म्हणजे या नाल्यामध्ये गाळ साचून राहिल्याने पावसाळय़ात पुन्हा यावषीही वडगाव, शहापूर, अनगोळ, मजगाव, येळ्ळूर, धामणे या शिवाराला फटका निश्चित बसणार आहे. तेव्हा या नाल्याची खोदाई आतापासूनच सुरू करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
दरवर्षी वडगाव, शहापूर, अनगोळ, मजगाव, येळ्ळूर, धामणे, जुनेबेळगाव आदी भागातील शेतकऱयांना नाल्याच्या पुराचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून दमदार पाऊस कोसळत असल्यामुळे या नाल्याला मोठा पूर येत आहे. या नाल्याचे पाणी शेकडो एकर जमिनीमध्ये जाऊन शिवारातील पिकांचे नुकसान होत आहे. वास्तविक या नाल्याची खोदाई आतापासूनच केल्यास पावसाळय़ापर्यंत ते काम पूर्ण होईल. तेव्हा आताच या नाल्याच्या खोदाईला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.
दरवर्षी बळ्ळारी नाल्यात जानेवारी महिन्यापर्यंत बऱयापैकी पाणी असते. आता पाणी पूर्णपणे गेले आहे. मात्र सध्या वडगाव, अनगोळ या परिसरातील डेनेजचे पाणी या नाल्याला जोडले गेले आहे. त्यामुळे नाल्यामध्ये दूषित पाणी साचून आहे. या पाण्यामुळे परिसरात काम करणे कठीण बनले आहे. प्रथम हे पाणी बंद करणे गरजेचे आहे. हे पाणी तातडीने बंद करावे, त्यामुळे नाला लवकर सुकेल व काम करणे सोयीचे होईल. तेव्हा हे सर्व पाणी बंद करावे, अशी मागणी होत आहे.
या नाल्यासाठी लोकप्रतिनिधी, लघुपाटबंधारे विभाग व महानगरपालिकेने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. कारण पुरामुळे दरवर्षी भातपिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. नुकसान झाल्यानंतर सरकारकडून प्रतिएकर तुटपुंजी भरपाई देऊन शेतकऱयांची बोळवण करण्यात येत आहे. काही वेळा एक पैसाही नुकसानभरपाई दिली जात नाही. ओल्या दुष्काळामुळे यावषी शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. भात कापणीच्या वेळेलाच यावषी जोरदार पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले होते. शिवारात अजूनपर्यंत पाणी साचून होते. बळ्ळारी नाला परिसरात अजूनही जमिनी ओल्या आहेत. त्यामुळे शेतकऱयांना रब्बी पेरणी करणेही कठीण बनले आहे. एकूणच बळ्ळारी नाल्यामुळे खरीप व रब्बी पिकालाही आता फटका बसू लागला आहे.
बळ्ळारी नाल्यातील गाळ काढावा, अशी शेतकऱयांनी सातत्याने मागणी केली आहे. लघुपाटबंधारे विभाग या नाल्याकडे लक्ष देत नसल्यामुळे यावर्षी कोणत्याही परिस्थितीत बळ्ळारी नाल्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणीही शेतकऱयांतून जोर धरू लागली आहे. नाल्याची खोली व रुंदी वाढविल्यास त्यात पाणी राहील व आजुबाजूच्या शेतकऱयांना लाभ होईल. याचबरोबर जे दूषित पाणी सोडले आहे ते पूर्णपणे बंद केले पाहिजे. याचबरोबर नाल्यामध्ये कचराही फेकला जात आहे. त्यामुळे नाला पूर्णपणे बुजून गेला आहे. येळ्ळूर रस्त्यावरील पुलाजवळ तसेच धामणे व इतर रस्त्यांवर असलेल्या पुलांजवळ हा कचरा टाकला जात आहे. तेव्हा त्याकडेही लक्ष देऊन हा नाला साफ करणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.
सध्या हलगा येथील या सांडपाणी प्रकल्पाला स्थगिती मिळाली आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता खोळंबला आहे. तेव्हा नाल्यातील गाळ आणि जलपर्णी तातडीने काढावी, अशी मागणी होत आहे. शहरातील सांडपाणी मोठय़ा प्रमाणात बळ्ळारी नाल्यात सोडण्यात येते. त्यामुळे नाल्यातील पाण्याचा निचरा बंद होताच परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे नाल्याजवळ शेत असणाऱया शेतकऱयांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे भात कापणी झाल्यानंतर बळ्ळारी नाल्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.
जलपर्णीच्या विळख्याने मोठी समस्या
गेल्या काही वर्षांपासून पाऊस आणि बळ्ळारी नाल्याला पूर हे समीकरणच बनले आहे. नाल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ व जलपर्णी वाढली आहे. जलपर्णी काढावी यासाठी गेली अनेक वर्षे शेतकरी बांधव लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांची भेट घेऊन मागणी करीत आहेत. मात्र, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. नाल्याच्या रुंदीकरणासाठी तसेच पक्के बांधकाम करण्यासाठी यापूर्वी 70 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. मात्र, काम हाती घेण्यापूर्वी नाल्यावर हलगानजीक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावा आणि त्यानंतरच रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास शेतकऱयांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पासाठी हलगा परिसरातील सुपीक जमिनींचे संपादन करण्यात येणार होते. त्यामुळे शेतकऱयांनी त्याला कडाडून विरोध केला.