मर्यादित फेऱयांमुळे प्रवाशांची गैरसोय, बसफेऱया वाढविण्याची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
अनलॉकनंतर परिवहन मंडळाने जिल्हय़ांतर्गत व राज्यांतर्गत बससेवा सुरू केली असली तरी मर्यादित फेऱया, विस्कळीत वेळापत्रकामुळे बसचा प्रवास गैरसोयीचा ठरत आहे. प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार गाडी निवडण्याची सुविधा नसल्याने मिळेल त्या गाडीने रवाना व्हावे लागत आहे. त्यामुळे बसच्या फेऱयात प्रवाशांची मात्र हेळसांड होताना दिसून येत आहे.
सर्व प्रकारच्या बस रस्त्यावर धावत असल्या तरी अद्याप ग्रामीण भागातील बऱयाच गावची बससेवा बंद आहे. मागील काही दिवसांत प्रवाशांनी पाठ फिरविल्याने परिवहनच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. लॉकडाऊन काळात सर्व प्रकारच्या बस जाग्यावर थांबून राहिल्याने परिवहनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खर्चात बचत करून उत्पन्न वाढीसाठी परिवहन प्रयत्नशील आहे. आता प्रवाशांचा प्रतिसाद हळुहळु वाढत असून उत्पन्नात वाढ होत आहे. मात्र वेळापत्रकातील नियमित गाडय़ा व फेऱयांची संख्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवासी नसल्याचे कारण देत ग्रामीण, आंतर जिल्हय़ातील अनेक मार्गांवर बस फेऱया कमी झाल्या आहेत. या ठिकाणी नियमित बसेस उपलब्ध कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी नोकरदार व कामगार वर्गांची संख्या वाढली आहे. मात्र ग्रामीण भागात अद्यापही बस पूर्ण क्षमतेने धावताना दिसत नाही. दरम्यान ग्रामीण भागात धावणाऱया बस फेऱयांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.