बेळगुंदी बसथांब्यावरील प्रकार : प्रवासी शोधताहेत निवारा : बसथांबा उभारण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या अनेक भागात स्मार्ट बसथांबे उभारून विकास साधला गेला आहे. मात्र, युनियन जिमखाना येथील बेळगुंदी भागात जाणाऱया प्रवाशांना बसथांबा नसल्याने भर उन्हात ताटकळत थांबण्याची वेळ आली आहे. याबाबत कित्येक वेळा तक्रारी करूनही संबंधिताचे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.
पश्चिम भागात जाणाऱया प्रवाशांना बसथांब्याअभावी उन्हा-तान्हात थांबावे लागत आहे. विशेषतः बेळगुंदी, बाकनूर, बिजगर्णी, बडस, राकसकोप, यळेबैल, सोनोली, बेनकनहळ्ळी, कावळेवाडी, तुडये आदी भागात ये-जा करणाऱया प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांची सतत ये-जा असते. मात्र प्रवाशांना ऊन-पावसापासून बचाव करण्यासाठी बसथांबा असल्याने शेजारी असलेल्या झाडांचा आधार घ्यावा लागत आहे.
पश्चिम भागातील विविध गावांतून दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे बसथांब्याजवळ प्रवाशांची गर्दी दिसून येते. मात्र, बसथांबा उभारण्याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांना वाढत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. सकाळी व सायंकाळी प्रवाशांची संख्या अधिक असते. दरम्यान, प्रवासी बसच्या प्रतीक्षेत भररस्यात थांबतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्मयता असते. हळूहळू उन्हाच्या झळादेखील वाढू लागल्याने प्रवाशांना बसथांब्याअभावी थांबणे असहय़ होत आहे. विशेषतः लहान मुले, महिला व वयोवृद्ध प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी बसथांबा उभारावा, अशी मागणी प्रवाशांतून जोर धरून आहे.