अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विभागीय नियंत्रण अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहनची बसपास प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बसपास मिळविताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रक्रिया सुरळीत करून विद्यार्थ्यांना तातडीने बसपास उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विभागीय नियंत्रण अधिकारी पी. वाय. नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जुन्या बसपासची मुदत 31 ऑगस्ट रोजी संपली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन बसपास आवश्यक बनला आहे. मात्र परिवहनकडून विद्यार्थ्यांना बसपास वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. पदवीच्या विद्यार्थ्यांना बसपासचे नुतनीकरण करून देण्यात येत असले तरी हे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसपास मिळण्यास विलंब होत आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांना बसपास मिळविण्यासाठी ऑनलाईनद्वारे अर्ज दाखल करावा लागत आहे. मात्र ही प्रक्रिया किचकट आणि वेळ खाऊ असल्याने विद्यार्थ्यांना बसपास मिळविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बसपास प्रक्रिया सुरळीत करून विद्यार्थ्यांना तातडीने बसपास उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे.
यावेळी रोहित मुमदाबादीमठ, किरण दुकानदार, सोमनाथ कोशी, शिवानंद हळ्ळी, लक्ष्मण, कार्तिक आदी विद्यार्थी उपस्थित होते.