अपुऱया व अनियमित बससेवेचा प्रवाशांना फटका : विद्यार्थ्यांचे मात्र होताहेत हाल : बसफेऱया वाढविण्यासाठी तातडीने उपाय योजन्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
अनलॉकनंतर सुरू झालेल्या बससेवेला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, अपुऱया व अनियमित बससेवेमुळे प्रवाशांबरोबर विद्यार्थीवर्गाची फरफट होत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत असून अपुऱया बससेवेमुळे दाटीवाटीने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. परिणामी कोरोना नियमांचा फज्जा उडत आहे. त्यामुळे परिवहन मंडळाने याची दखल घेऊन बसफेऱया वाढवून बससेवा सुरळीत करावी, अशी मागणी प्रवाशांतून जोर धरत आहे.
शाळा-महाविद्यालयांपाठोपाठ दहावी-बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्याबरोबरच सहावी, सातवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यागम कार्यक्रमही सुरू झाला आहे. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत बसफेऱया अपुऱया असल्याने प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची बसमध्ये चढण्यासाठी चढाओढ सुरू होत आहे. परिणामी गर्दी होऊन कोरोना नियमांचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे.
अपुऱया व अनियमित बससेवेमुळे प्रवाशांबरोबर विद्यार्थीवर्गाचे हाल होत असून त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना बसपास असूनही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बसफेऱयाच कमी असल्याने विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये वेळेत पोहोचणे मुश्कील होत आहे. बसस्थानकातील बसपास विभागात बसपासचे काम सुरू आहे. त्यामुळे बसपास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे. विद्यार्थ्यांना बसस्थानकात फेऱया माराव्या लागत आहेत. बसफेऱयांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होताना दिसत आहे.
कोरोनामुळे परिवहन मंडळाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी परिवहन मंडळ कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे प्रवाशांची बसअभावी गर्दी होताना दिसत आहे. मध्यवर्ती बसस्थानकासह आरटीओ, आरपीडी, यंदे खुट, चंदगड बसथांबा, चन्नम्मा सर्कल आदी ठिकाणी प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. वेळेत बस मिळत नसल्याने प्रवाशांना तासन्तास बसथांब्यांवर ताटकळत थांबावे लागत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची उसळली गर्दी
मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची गर्दी उसळली होती. त्यामुळे कोरोनाचा प्रवाशांना विसर पडल्याची चर्चा सर्वसामान्यांतून होत आहे. बसस्थानकात प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, बसफेऱयांअभावी प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बसफेऱया वाढविण्याबरोबर बसस्थानकात प्रवाशांना शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे. शिवाय परिवहनने प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराक्यात, अशी मागणी होत आहे.
आरपीडी कॉर्नरजवळ ग़्विद्यार्थ्यांची फरफट
बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ सुरू असल्याचा धोकादायक प्रकार नुकताच आरपीडी कॉर्नरजवळ घडला होता. दरम्यान, बसचालकाने बसथांब्यावर बस न थांबविता पुढे नेली. विद्यार्थी बसमध्ये चढण्यासाठी बसच्या पाठीमागून धावताना दिसून आले. परिवहनने कोरोना संसर्गाबरोबर विद्यार्थीवर्गाचे होणारे अतोनात हाल लक्षात घेऊन बसफेऱया वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.