जहाज कंपनीने दिले पगार व अन्य खर्च, मेरीटाईम बोर्डाकडूनही ग्रीन सिग्नल
प्रतिनिधी / रत्नागिरी
गेल्या वर्षभरापासून मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेल्या इंधनवाहू जहाज एमटी बसरा स्टार जहाजामधील 2 परदेशी व 10 देशी खलाशांची लवकरच घरवापसी होणार असल्याची माहिती जहाजाचे कॅप्टन सुब्बाराव यांनी दिली.
गेले वर्षभर येथे अडकून राहिल्यानंतर जहाज कंपनी खलाशांचा सर्व पगार व अन्य खर्च देणार असून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे असलेले पासपोर्ट व अन्य कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर हे खलाशी आपल्या घरी परतणार आहेत. जहाजाचे कॅप्टन व अन्य एक खलाशी जहाज स्कप झाल्यानंतरच स्वगृही जाणार आहेत.