जहाज भंगारात काढण्याची प्रक्रियाही रेंगाळली
प्रतिनिधी/ रत्नागिरी
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे एमटी बसरा स्टार हे परदेशी डिझेलवाहक जहाज गेले 6 महिने मिऱया किनाऱयावर अडकले आहे. या जहाजाच्या भंगारात काढण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली नसल्यामुळे जहाजावरील 13 खलाशी शहरामध्ये अडकून पडले आहेत़ यापैकी 3 खलाशी परदेशी आहेत़ नौवहन महानिदेशालयातर्गंत जहाज भंगारात काढण्याची कार्यवाही होणार असल्याने हे खलाशी पगाराविना असल्याची माहिती जहाजाचे पॅप्टन एस. सरकार यांनी दिल़ी
या जहाजाच्या मालकाचे प्रतिनिधी प्रवीण शर्मा यानी खलाशांची राहण्या-जेवण्याची सोय केली आहे. मात्र वेतन व इतर सुविधांबाबात आश्वासनापलिकडे काहीही मिळालेले नाही. मालकाला जहाजाच्या भंगाराची 1 कोटीपेक्षा जास्त किंमत अपेक्षित आहे. मात्र ही किंमत मिळत नसल्याने जहाजाबरोबरच खलाशी व कॅप्टन किनाऱयावरच अडकून पडले आहेत.
एमटी बसरा स्टार हे डिझेलवाहक जहाज निसर्ग चक्रीवादळामुळे भगवतीबंदर येथे आश्रयाला आले होत़े वादळात भरकटून ते मिऱया किनाऱयावर लागल़े जहाजात सुमारे 32 हजार लिटर डिझेल होत़े डिझेल समुद्रामध्ये मिसळण्याची शक्यता लक्षात घेत हे डिझेल काढून किनारपट्टी सुरक्षित केली होत़ी यानंतर जहाजाच्या दुबईस्थित मालकाला जहाज हलवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. यानंतर जहाज मालकाने प्रतिनिधी पाठवून खलांशीची राहणे व खाण्यापिण्याची सोय केली होत़ी
सद्यस्थितीमध्ये जहाज भंगारात काढण्यासाठी कोणतीही विशेष हालचाल सुरु नसल्याने समजते. जहाजावरील 13 खलांशाना पगार मिळत नसून त्यांचे पासपोर्ट व इतर कागदपत्रे मेरीटाईम बोर्डाच्या ताब्यात असल्यामुळे त्यांचा घरी परतण्याचा मार्गही बंद झाला आहे.