सांबरा : बसवण कुडची गावातून गेलेल्या रस्त्याचे काम बंद केल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गावातील मुख्य वेशीतील रस्ता खराब झाला होता. त्यामुळे रस्त्याचे काम करून द्यावे, अशी वारंवार ग्रामस्थांतून मागणी होत होती. अखेर ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत पंधरा ते वीस दिवसांपूर्वी रस्त्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. जुना रस्ता उकरून काढून त्यावर खडी पसरविण्यात आली. त्यानंतर लगेच काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, पंधरा दिवस झाले तरी काँक्रिटीकरण न केल्याने वाहनचालकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम बंद ठेवण्यामागे गौडबंगाल काय, असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारण्यात येत आहे. जर रस्त्याचे काम लवकर करायचे नव्हते तर सुरुवात कशाला केली, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याकडे संबंधित लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालून कंत्राटदाराकडून तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.
Previous Articleकणबर्गी येथील गटार बांधकाम पूर्ण करण्याची मागणी
Next Article श्री महालक्ष्मी हायस्कूलमध्ये पालक मेळावा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.