प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सीटी बनविण्यासाठी शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून डेकोरेटीव्ह दिवे बसविण्यासाठी कोटीचा निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र, गोवावेस बसवेश्वर चौका शेजारी खानापूर रोडवर निर्माण झालेले खड्डे बुजविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे याचा फटका वाहनधारकांना बसत असून, निर्माण झालेल्या खड्य़ांमुळे अपघात घडत आहेत.
विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. शुक्रवारपेठेमधून बसवेश्वर चौकाला जोडणाऱया रस्त्यावर काँक्रिट घालण्यात आले आहे. पण या शेजारी असलेल्या खानापूर रोडच्या रस्त्याचा विकास करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे खानापूररोडवर बसवेश्वर चौकाशेजारी नेहमी खड्डे निर्माण होत आहेत. गतीरोधकाशेजारी मोठा खड्डा निर्माण झाल्याने महापालिकेने या ठिकाणी पेव्हर्स घालून अलिकडेच रस्ता व्यवस्थित बनविला होता. पण, त्यापुढे असलेल्या खड्डय़ांची दुरूस्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे पेव्हर्स बसविलेल्या बाजूला आता नवीन खडय़ांची भर पडली आहे. या परिसरातील काही अंतराच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. अशातच या ठिकाणी गतीरोधक घालण्यात आले आहेत. गतीरोधकामुळे रस्त्यावरून वाहणाऱया पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण होत असून, पावसाचे पाणी साचून रहात आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने खड्डे निर्माण होत आहेत. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याबरोबरच या परिसरातील खड्डे व्यवस्थित बुजविण्याची गरज आहे.
खड्डे बुजविण्याची मागणी
या ठिकाणी निर्माण झालेले खड्डे वाहतुकीस अडचणीचे बनले आहेत. परिसरात बसथांबा असल्याने प्रवाशांना घेण्यासाठी बस आणि वडाप वाहने थांबविण्यात येतात. त्यामुळे अन्य वाहनधारकांना खड्य़ातून ये-जा करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याचा प्रयत्न होत असल्याने अपघात होण्याची शक्मयता आहे. या परिसरात निर्माण झालेले खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.