शेतकरी आंदोलनाचा धसका :
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकरी संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदचा तितकासा परिणाम बस सेवेवर झाला नाही. मध्यवर्ती बस स्थानकातून मंगळवारी दिवसभर शहर तसेच ग्रामीण भागात सुरळीत बससेवा सुरू होती. परंतु बंदचा धसका घेतल्याने प्रवाशांची संख्या मात्र रोडावलेली दिसली. यामुळे चालक व वाहकांना प्रवाशांची वाट पाहत बसावे लागत होते.
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात मंगळवारी शेतकरी संघटनांनी बंद पुकारला होता. शेतकरी संघटनांनी मंगळवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केल्यामुळे काही काळ बससेवा ठप्प झाली होती. परंतु त्यानंतर बससेवा सुरळीत झाली. शहरासोबतच ग्रामीण भागातही बस सोडल्या जात होत्या. परंतु प्रवाशांची संख्या अत्यंत कमी असल्याने रोजच्या इतक्मया फेऱया होत नसल्याचे वाहक व चालकांकडून सांगण्यात येत होते.
शेतकरी आंदोलनामुळे बस बंद झाल्यास कसा प्रवास करणार याचा विचार करून प्रवाशांनी बस प्रवास टाळला. ग्रामीण भागातून येणाऱया प्रवाशांची संख्याही अत्यंत कमी होती. शहरी भागातही मोजक्मयाच बसेस धावताना दिसत होत्या. यामुळे शहरातील प्रवाशांना रिक्षा चालकांवर अवलंबून राहावे लागले.
लांब पल्ल्याच्या गाडय़ांवर परिणाम
मध्यवर्ती बसस्थानकातून महाराष्ट्रात जाणाऱया बसची संख्या कमी दिसून येत होती. प्रवाशांनी धास्ती घेतल्यामुळे मर्यादित स्वरुपात कोल्हापूरपर्यंत बस सोडल्या जात होत्या. प्रवासीच नसल्याने बऱयाच बस स्थानकात थांबून ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे बससेवा सुरळीत असतानाही प्रवाशांची संख्या मात्र कमी असल्याचे मंगळवारी दिसून आले.