लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर करून सदस्यातून सरपंच निवड
सांगरूळ / प्रतिनिधी
बहिरेश्वर (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी युवराज दिंडे यांची बिनविरोध निवड झाली .मंडल अधिकारी प्रवीण माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक होऊन युवराज दिंडे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली .लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर करून सदस्यातून सरपंच निवड झाल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे .
लोकनियुक्त सरपंच साऊबाई नारायण बचाटे यांच्याविरुद्ध ग्रामसभेद्वारे थेट जनतेतून प्रत्यक्ष मतदान घेऊन अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सरपंच पद रिक्त होते .सरपंच पदासाठी युवराज दिंडे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण माने यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले . सरपंच पदाच्या निवडीसाठी झालेल्या सदस्यांच्या बैठकीसाठी दहापैकी आठ सदस्य उपस्थित होते तर दोन सदस्य गैर होते .
जुलै २०१८ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे सीताराम पाटील, सूर्यकांत दिंडे, भगवान दिंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीतून लोकनियुक्त सरपंच बचाटे यांच्यासह आघाडीची सत्ता आली होती. पण गटा अंतर्गत असलेल्या अंतर्गत मतभेदामुळे सदस्यांनी साऊबाई बचाटे यांचेवर .अविश्वास ठराव आणला होता .याला सौ बचाटे यांनी न्यायालयातून स्थगिती ती आणली होती .लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी ग्रामसभा घेऊन थेट जनतेतून मतदान घेऊन घेऊन निर्णय घ्यावा असे आदेश न्यायालयाने दिले होते .यानुसार २६ नोव्हेंबर २०२० रोजी विशेष ग्रामसभा घेऊन सरपंच साऊबाई बचाटे यांच्यावर जनतेतून प्रत्यक्ष मतदान घेऊन अविश्वास ठराव मंजूर केला होता.काँग्रेसला मानणाऱ्या तिन्ही गटाना एकत्र ठेवून लोकनियुक्त सरपंचांवर अविश्वास ठराव आणून नवीन सरपंच निवडण्यात जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांनी महत्वाची भूमिका पार पाडली .लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत मंजूर करून सदस्यांच्या मधून सरपंच निवडण्याची ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे .
नूतन सरपंच युवराज दिंडे यांचा जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी जि .प. सदस्य सुभाप सातपुते ,सिताराम पाटील, सूर्यकांत दिंडे, भगवान दिंडे, रघुनाथ वरुटे उपसरपंच सुवर्णा दिंडे ,ग्रामपंचायत सदस्य उत्तम चव्हाण,कृष्णात सुतार,तानाजी गोदडे,रंजना रामचंद्र दिंडे,रंजना संभाजी दिंडे, शालाबाई कांबळे ग्रामविकास अधिकारी आर आर भगत तलाठी पुरुषोत्तम ठाकूर यांचे सह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते . गावातील सत्ताधारी गटाचे सर्व नेते व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न करेन अशी ग्वाही नूतन सरपंच युवराज दिंडे यांनी यावेळी दिली .