ऑनलाईऩ टीम / नवी मुंबई
महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर पुन्हा एकदा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेलक्या शब्दात टीका केली असुन सरळ सेवा भरती प्रक्रीयेतून भरल्या जाणाऱ्या आरोग्य विभागातील (arogya sevak bharti 2021) पद भरतीची परिक्षा ऐनवेळी पुढे गेल्याने तयारी करणाऱ्या युवा वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच मुद्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर पदभरतीच्या मुद्य्यावरून जोरदार टीका केली आहे. यावर ट्वीट केले आहे.
या ट्वीटमध्ये “आघाडीसरकारमध्ये अनेक विभागात ११ हजार ३५१ पद रिक्त असताना, मात्र यांनी MPSC कडे फक्त ४ हजार २६४ पदांची मागणी केली. स्वतःच्या मुलांना आमदार-खासदार करण्यापुरते प्रस्थापितांकडे रिक्त पदं आहेत. बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता.” अशी जोरदार टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळक (gopichand padalkar) यांनी केली आहे. सोबत एक व्हिडिओ ही शेअर केला आहे. ज्याच्यात त्यांनी भरती प्रक्रियेत परिक्षार्थींना होणाऱ्या अडचणींचा लेखा -जोखा मांडत प्रशासन आणि सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. मग हे काय फक्त टक्केवारीच्या फुगड्या खेळतायेत का ? अशी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. याला आता महाविकास आघाडी सरकार कसे प्रतिउत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.