प्रतिनिधी / रत्नागिरी
बिघडलेल्या वातावरणाचा परिणाम मच्छीमारी व्यवसायावर झालेला होत़ा. गेल्या आठवड्यापासून परिस्थिती सुधारु लागली आह़े. मासेमारी नौकांना मोठ्या पमाणात बांगडा मिळत आह़े. बांगड्याची मोठ्या प्रमाणात मिरकरवाडा बंदरामध्ये आवक झाल्यामुळे बांगड्याचा भाव घसरला आह़े.
शुक्रवारी बांगड्याच्या एका डिशला 1600 ते 1700 रुपये इतका दर मिळाला आह़े. दोन-तीन दिवसांपूर्वी हाच दर 2200 ते 2300 इतका होत़ा. एका-एका मासेमारी नौकेला सुमारे 70 ते 80 डिश बांगडा मिळाल्याची माहिती मच्छीमारांनी दिल़ी गतवर्षी बांगडा मिळण्याचे प्रमाण कमी होत़े. मात्र यंदा हा मासा मोठ्या पमाणात मिळत आह़े,. बांगडा खाण्याबरोबरच निर्यातही करण्यात येत़ो. बांगड्याचा दर घरसल्यामुळे किरकोळ बाजारातही बांगडा खरेदीला ग्राहकांनी पसंती दिल़ी. सध्या बांगड्याबरोबरच सुरमई, म्हाकूळसह गेदर आदी मासळी मिळत आह़े. यंदा सुरमईचे पमाण अल्प आह़े त्यामुळे खवय्यांना चढ्या दराने सुरमई खरेदी करावी लागत आह़े. सध्या सुरमई 300 ते 700 रुपये पतिकिलोने विक्री केली जात आह़े. वातावरणामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे थंडीचा जोर ओसरला आह़े. परिणामी मतलई वाराही कमी झाला आह़े. त्यामुळे छोट्या गिलनेटसह मोठ्या नौकांना मासळी मिळत आह़े.
किनारपट्टीनजीक जेलीफिश व डॉल्फिनच्या वावरामुळे मच्छीमारांच्या त्रास सहन करावा लागत आह़े. काळबादेवीनजीक डॉल्फिनच्या झुंडी मच्छीमारांना दिसल्या आहेत़. काही मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान झाल्याचे मच्छीमारांनी सांगितल़े मात्र थंडीचा जोर कमी होईल तसे जेलीफिश व डॉल्फिनचा उपद्रव कमी होईल, असे जाणकार मच्छीमारांनी सांगितल़े.