वृत्तसंस्था / लाहोर :
यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी बांगलादेश क्रिकेट संघाचे बुधवारी रात्री येथे आगमन झाले. विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
पाकमध्ये कसोटीत मालिका खेळण्यास बांगलादेश क्रिकेट मंडळाने सुरक्षेच्या समस्येमुळे नकार दिला होता. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाने केवळ तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्याची तयारी दर्शविली. आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी दुबई पाक क्रिकेट मंडळाचे चेअरमन एहसान मणी आणि बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नझमूल हसन यांच्यात मध्यस्थी केल्यानंतर ही मालिका निश्चित झ्घाली. बांगलादेश आणि पाक यांच्यातील या मालिकेतील सर्व म्हणजे तीन सामने लाहोरमध्ये खेळविले जातील. पहिला सामना शुक्रवारी, दुसरा शनिवारी तर तिसरा सोमवारी होणार आहे. पीसीबीने या मालिकेवेळी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.